शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

आंदोलन चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:27 IST

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता काँग्रेसच्या नेतृत्वात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकाही काळ तणाव : शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा व रास्तारोको

आॅनलाईन लोकमतभिसी : चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता काँग्रेसच्या नेतृत्वात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर भिसी बायपासवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी एकही वरिष्ठ अधिकारी न आल्याने आंदोलनकर्त्यांनी निवेदन देण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.भिसी, वाढोणा येथे वनविभागाने मंजूर केलेल्या जाळीच्या कुंपनाच्या निविदा पुनश्च काढण्यात याव्या, जंगली जनावरांपासून होणारी शेतीची नुकसान भरपाई नुकसानीच्या तुलनेत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव व अधिकचा ५० टक्के नफा देण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात यावा, कृषिपंपाची डिमांड भरताच एक महिन्याच्या आत वीज जोडणी झालीच पाहिजे, गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा जलसिंचन कालव्याच्या दुरूस्तीसह बांधकाम पूर्ण करावे, शेतमजुरांना शेतीसाठी शासकीय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, वनडेपोत बांबु व लाकडांचा पुरवठा नियमित उपलब्ध करून देण्यात यावा, भिसी परिसरातील चिंचोली सावर्ला, डोंगर्ला, जांभूळहिरा, नवेगाव, पुयारदंड, गडपिपरी, सिरसपूर, शिवरा, लावारी इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेती जंगलालगत असल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांची जंगली जनावरे नासधूस करीत असतात. त्यामुळे सदर गावांच्या सभोवताल काटेरी कुंपन करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. सदर आंदोलनात जि.प.चे काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजुकरांसह शेतकरी शंभरावर बैलबंडी घेऊन सहभागी झाले होते.आंदोलनकर्त्यांना अटक व सुटकाआंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यां डॉ. सतीश वारजूकर यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आंदोलनकर्ते संतापले. त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून वाहन अडवून धरले. अखेर पोलिसांना हतबल होऊन अटक केलेल्या डॉ.वारजूकर यांच्यासह इतरांना सोडून द्यावे लागले.