शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

खत खरेदीतून अंगठा बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खत विक्रेत्यांसाठी शासनाने ई-पास मशिन दिले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मशिन बिनकामी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून ई-आधार नंबरद्वारे खत सुरू करण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांकडून अंगठा घेण्याची सक्ती राहिली नाही. ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांनी शासनाच्या निर्देशांचे ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जिल्ह्यात खताचा मुबलक साठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खत विक्रेत्यांसाठी शासनाने ई-पास मशिन दिले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मशिन बिनकामी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून ई-आधार नंबरद्वारे खत सुरू करण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांकडून अंगठा घेण्याची सक्ती राहिली नाही. ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खत उपलब्ध करून दिले नाही तर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकरी खताची खरेदी करीत आहेत. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावे, याकरिता शासनाने ५० ऐवजी ४५ किलोची गोणी तयार केली. याबाबत शेतकरी समाधानी आहेत. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होऊ नये, याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविली होती. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. परंतु, ुसोयाबीन, कापूस, धान व अन्य कडधान्य पिकांसाठी कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कमी मात्रेमध्ये रासायनिक तसेच मिश्र खतांचा वापर करणे गरजेचे आहे. पण अनुदानाच्या आमिषामुळे गैरव्यवहाराचे प्रकार घडत होते. शेतकऱ्यांना ही खते अनुदानावर दिली जातात. मात्र यापुर्वीच्या चुकीच्या पद्धतीमुळे कृषी व्यापाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात फायदा व्हायचा. हा गैरव्यवहार टाळण्यासाठी शासनाने परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना ई-पास (पॉइंट आॅफ सेल) मशीन देण्याचा निर्णय घेतला होता. या मशिनद्वारेच शेतकऱ्यांना खत खरेदी करावी लागत होती. त्यावर अंगठा लावल्याशिवाय विके्रते शेतकऱ्यांना खत देत नव्हते. जिल्ह्यातील दुर्गम भागातील कृषी केंद्रांमध्ये ई-पास मशिन वारंवार बंद पडण्याच्या घडत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. पास मशिनच्या नियमामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला. तर दुसरीकडे काही दुकानांमध्ये हीच मशिन नसल्याने खत खरेदी करण्याचे अधिकृत मार्ग बंद झाले होते. शेतकऱ्यांनी याविरूद्ध तक्रारी केल्याने आधार क्रमांकावर रासायनिक व मिश्र खते देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खत खरेदीसाठी विक्रेत्यांनी मशिनवर अंगठा ठेवणे सक्तीचे केले. यातून समस्यांमध्ये वाढच झाली. दुकानदारांनी पास मशिन बंद असल्याचा कारणावरून शेतकऱ्यांना परत पाठवू लागला. ही अडचण आता दूर झाली आहे.नादुरुस्त मशिनमुळे विक्रेते त्रस्तकृषी निविष्ठा विक्रीकरिता शासनाने ई-पास मशिन पुरविले होते. पण, जिल्ह्यातील बहुतांश विक्रेत्यांकडील मशिन बंद असल्याचा आरोप कृषी विक्रेत्यांनी केला. खत खरेदीकरिता आधार कार्डचा पर्याय स्वीकारण्यात आला. परंतु, यासंदर्भात पत्र न मिळाल्याने विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शासकीय यंत्रणेकडून मशिन दुरुस्त करण्याची मागणी कृषी विके्रत्यांनी केली आहे.