शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

खत खरेदीतून अंगठा बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खत विक्रेत्यांसाठी शासनाने ई-पास मशिन दिले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मशिन बिनकामी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून ई-आधार नंबरद्वारे खत सुरू करण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांकडून अंगठा घेण्याची सक्ती राहिली नाही. ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांनी शासनाच्या निर्देशांचे ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जिल्ह्यात खताचा मुबलक साठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खत विक्रेत्यांसाठी शासनाने ई-पास मशिन दिले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मशिन बिनकामी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून ई-आधार नंबरद्वारे खत सुरू करण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांकडून अंगठा घेण्याची सक्ती राहिली नाही. ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खत उपलब्ध करून दिले नाही तर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकरी खताची खरेदी करीत आहेत. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावे, याकरिता शासनाने ५० ऐवजी ४५ किलोची गोणी तयार केली. याबाबत शेतकरी समाधानी आहेत. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होऊ नये, याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविली होती. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. परंतु, ुसोयाबीन, कापूस, धान व अन्य कडधान्य पिकांसाठी कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कमी मात्रेमध्ये रासायनिक तसेच मिश्र खतांचा वापर करणे गरजेचे आहे. पण अनुदानाच्या आमिषामुळे गैरव्यवहाराचे प्रकार घडत होते. शेतकऱ्यांना ही खते अनुदानावर दिली जातात. मात्र यापुर्वीच्या चुकीच्या पद्धतीमुळे कृषी व्यापाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात फायदा व्हायचा. हा गैरव्यवहार टाळण्यासाठी शासनाने परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना ई-पास (पॉइंट आॅफ सेल) मशीन देण्याचा निर्णय घेतला होता. या मशिनद्वारेच शेतकऱ्यांना खत खरेदी करावी लागत होती. त्यावर अंगठा लावल्याशिवाय विके्रते शेतकऱ्यांना खत देत नव्हते. जिल्ह्यातील दुर्गम भागातील कृषी केंद्रांमध्ये ई-पास मशिन वारंवार बंद पडण्याच्या घडत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. पास मशिनच्या नियमामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला. तर दुसरीकडे काही दुकानांमध्ये हीच मशिन नसल्याने खत खरेदी करण्याचे अधिकृत मार्ग बंद झाले होते. शेतकऱ्यांनी याविरूद्ध तक्रारी केल्याने आधार क्रमांकावर रासायनिक व मिश्र खते देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खत खरेदीसाठी विक्रेत्यांनी मशिनवर अंगठा ठेवणे सक्तीचे केले. यातून समस्यांमध्ये वाढच झाली. दुकानदारांनी पास मशिन बंद असल्याचा कारणावरून शेतकऱ्यांना परत पाठवू लागला. ही अडचण आता दूर झाली आहे.नादुरुस्त मशिनमुळे विक्रेते त्रस्तकृषी निविष्ठा विक्रीकरिता शासनाने ई-पास मशिन पुरविले होते. पण, जिल्ह्यातील बहुतांश विक्रेत्यांकडील मशिन बंद असल्याचा आरोप कृषी विक्रेत्यांनी केला. खत खरेदीकरिता आधार कार्डचा पर्याय स्वीकारण्यात आला. परंतु, यासंदर्भात पत्र न मिळाल्याने विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शासकीय यंत्रणेकडून मशिन दुरुस्त करण्याची मागणी कृषी विके्रत्यांनी केली आहे.