शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारांच्या आदेशानंतरही पोलीस चौकी बंद

By admin | Updated: July 19, 2014 23:50 IST

शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील काही भागांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र यातील काही चौकी नेहमी कुलूप बंद रहात असल्याने नागरिकांना मोठा त्रास

चंद्रपूर : शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील काही भागांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र यातील काही चौकी नेहमी कुलूप बंद रहात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पोलीस चौकीच्या परिसरात गुऱ्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील पोलीस चौकी पूर्णवेळ सुरु ठेवून येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.येथील बाबूपेठ परिसरातील नागरिकांच्या तक्रारी तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस चौकी निर्माण करण्यात आली. ही चौकी पूर्वी व्यवस्थित सुरु होती. मात्र मध्यंतरी या चौकीला कुलूप लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस चौकी पूर्ववत सुरु झाली. मात्र काही दिवसातच चौकीमध्ये अनियमितपणा आला. महिनाभरात अर्धेअधिक दिवस ही चौकी बंद रहाते. त्यामुळे येथील काही नागरिकांनी ठाणेदाराकडे याबाबत तक्रार दाखल केली. ठाणेदारांनी तत्काळ दखल घेत ही पोलीस चौकी सुरु ठेवण्याचे आदेश दिले. मात्र ठाणेदाराच्या आदेशाली पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. पोलीस चौकी पूर्णवेळ सुरु रहात नाही. त्यामुळे अनेकवेळा तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलिसांची वाट बघत ताटकळत बसावे लागते. चौकी बंद रहात असल्याने अवैध धंदे, छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील पोलीस चौकी नियमित सुरु ठेवून नागरिकांना दिल्यासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १९ जूलै रोजी सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध कामांसाठी सकाळी ११ वाजता बोलाविले. पोलिसांच्या आदेशानुसार नागरिक सकाळी ११ वाजता पोलीस चौकीत पोहोचले. मात्र येथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला. ठाणेदारांनी याकडे लक्ष देवून पूर्णवेळ पोलीस चौकी सुरु राहील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(नगर प्रतिनिधी)