शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही जि. प. तील २६३ अनुकंपाधारकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:08 IST

जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधीत कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा आदेश राज्य शासनाने दिला होता. मात्र, जिल्हा परिषदेतील तब्बल २६३ अनुकंपधारकांची पदे अद्याप भरण्यात आली नाही. त्यामुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीविना हाल सुरू आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा : नोकरीपासून वंचित राहिल्याने कुटुंबीयांचे हाल
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधीत कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा आदेश राज्य शासनाने दिला होता. मात्र, जिल्हा परिषदेतील तब्बल २६३ अनुकंपधारकांची पदे अद्याप भरण्यात आली नाही. त्यामुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीविना हाल सुरू आहेत.जिल्हा परिषद अंतर्गत मागील १५ वर्षांपासून अनुकंपधारकांचा जागा भरण्यात आल्या नाहीत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग, ग्रामीण विकास, विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अनुकंपधारकांनी वारंवार पाठपुरावा केला होता. दरम्यान नोकरीमध्ये पात्र ठरणाºया अनुकंपधारकांना तातडीने सामावून घेण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केला. परंतु जि. प. ने या आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. शासनाचे तत्कालीन प्रधानसचिव (सेवा) भगवान सहाय यांनी अनुकंपधारकांचे प्रश्न योग्यरित्या समजून घेतले. त्यानंतर संबंधित अधिकाºयांना पुढील कारवाईचे आदेश दिले होते. हा आदेश जिल्हा परिषदेमध्ये धडकल्यानंतरही कारवाई झाली नाही. २०१५ पासून जि. प. मध्ये केवळ एकाच व्यक्तीची अनुकंप जागेवर नियुक्ती करण्यात आल आहे. त्यातही योग्य श्रेणी देण्यात आली नाही. याचा अनिष्ठ परिणाम अनुकंपधारकांवर झाला आहे. २६८ अनुकंपधारकांच्या जागा रिक्त आहेत. आता ही संख्या ३०० पेक्षाही अधिक झाल्याचेही अन्यायग्रस्तांनी सांगितले.केवळ टोलवाटोलवीची उत्तरेअनुकंपधारकांना जिल्हा परिषदेमध्ये तातडीने रुजू करून घेण्याचे आदेश शासनाने दिले. यानंतर पात्र व्यक्तींनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. राज्य शासनाच्या आदेशाची प्रत दाखविली. तत्कालीन मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या राज्यमंत्र्यांचेही पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र टोलवाटोलवीचा हा प्रकार मागील १५ वर्षांपासून सुरूच आहे. परिणामी कुटुंबातील आधार कोसळल्याने आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करण्याची वेळ जिल्ह्यातील २६३ अनुकंपधारकांवर आली आहे.