शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

आमदारकीनंतर गोरगरिबांच्या वकिलीसाठी पुन्हा न्यायालयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे यांनी महाराष्ट्रात अनेक माणसे जोडली. पक्षीय बांधिलकीच्या पलीकडे जाऊन सामाजिक न्यायासाठी पुरोगामी चळवळींना ताकद दिली. ...

आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे यांनी महाराष्ट्रात अनेक माणसे जोडली. पक्षीय बांधिलकीच्या पलीकडे जाऊन सामाजिक न्यायासाठी पुरोगामी चळवळींना ताकद दिली. भारतीय संविधानातील जीवनमूल्यांची समाजमनात पुनर्स्थापना व्हावी, यासाठी १९७० च्या दशकात राजुरा येथे दहा दिवसीय संस्कार शिबिरांचे आयोजन सुरू केले. या शिबिरात महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांनी उपस्थिती दर्शविली. यातून सत्यशोधक चळवळीला वाहून घेणारी तरुणाई पुढे आली. नवोदितांना विविध विषयांवर लिहिते करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने अनेक संमेलने घेतली. आमदारकीच्या अहंकाराचा वारा त्यांना कधी शिवला नाही. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांशी त्यांनी आयुष्यभर सहज संवाद सुरू ठेवला. फुले, आंबेडकर व मार्क्सवादी विचारांचे कालसाक्षेप पाईक होते. गांधी-नेहरू विचारांची काँग्रेस पक्षीय मूल्ये स्वीकारूनही अ‍ॅड. साळवे हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून वावरले. तत्कालीन अनेक मोठे नेते व शरद पवारांशी अत्यंत स्नेहाचे संबंध असतानाही त्यांनी स्वहिताचा विचार केला नाही. त्यामुळे ॲड. एकनाथ साळवे हे प्रामाणिक लोकनेते म्हणून कायम स्मरणात राहणार आहेत.

आमराईतील आंदोलन गाजले

चंद्रपूर औष्णिक केंद्र उभारण्यासाठी ऊर्जानगर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. आमदार असताना याविरुद्ध अ‍ॅड. एकनाथ साळवे यांनी आमराईत बैठा सत्याग्रह केला होता. सरकारकडून मागणी मान्य झाल्यानंतर सत्याग्रहाची सांगता झाली. त्या आंदोलनामुळेच न्याय मिळाल्याची कृतज्ञता ऊर्जानगर परिसरात शेकडो शेतकरी आजही व्यक्त करतात.