शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

स्वातंत्र्यानंतरही आदिवासींच्या जीवनात अंधार

By admin | Updated: May 23, 2015 01:31 IST

आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जातात.

जिवती: आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. प्रत्यक्ष त्या योजनेचा फायदा कितपत त्या आदिवासी बांधवाना होतो, याचा प्रत्यय आता पहाडावरील आदिवासी गाव-गुडे पाहिल्यानंतर येतो. जीवती तालुक्यातील १२ घरांची वस्ती असलेल्या जीवती तालुक्यातील लखमापूर (येरवा) या आदिवासी गुड्ड्याला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता, तेथील भयाण वास्तव्य समोर आले. वीज, आरोग्य, रस्ते, पाण्याबरोबरच विजेचा प्रकाशही गावात पोहोचला नाही. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही या आदिवासी बांधवाना अंधारात जीवन जगावे लागत आहे.डोंगराच्या कुशीत असलेल्या लखमापूर (येरवा) गावात १२ घरांची वस्ती आहे. ७० च्या जवळपास येथील लोकसंख्या असून प्रत्येक गावगुड्यातील नागरिकांना सोयी- सुविधा मिळणे आवश्यक असताना बंधनकारक असली तरी लखमापूर (येरवा) विविध विविध कायमच्या चिटकून बसल्या आहेत. गावात जायला योग्य रस्ता नाही. महामंडळाची बस गावात जात नाही, दूरध्वनी सेवाही नाममात्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तर गावकऱ्यांचे हाल होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारे कर्मचारी कर्तव्यापुरते गावात येतात. गाव विकासाची महत्वाची धुरा सांभाळणारा ग्रामसेवकही गावात येत नसल्याचे गावकरी सांगतात. गृहकर वसुलीसाठी चपऱ्याशाला गावात पाठविले जात असल्याची माहितीही येथील नागरिकांनी दिली. आदिवासी बांधवाना विजेची सोय व्हावी, यासाठी गावकरी व शाळकरी मुलांनी विद्युत विभाग कार्यालय, बल्लारपूर, जीवती, तसेच या क्षेत्राचे आमदार संजय धोटे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकवेळा निवेदने देण्यात आलीत. मात्र त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. २०११ मध्ये गावात विजेचे खांब आले. तारही टाकण्यात आलेत.मात्र अद्यापही वीज जोडण्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्यात; पण संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे या आदिवासी बांधवाना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या घोषणा देत सभा गाजविणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्ष गावात जावून जनतेच्या समस्या जाणून समस्या सोडविण्याची मागणी आनंदराव कोटनाके चिन्नु, कोटनाके,रघुनाथ कोटनाके आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)