शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

पतीनंतर कर्ता मुलगाही गमावल्याने ‘आई’च झाली पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष बी.यू. बोर्डेवार राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन ...

मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष

बी.यू. बोर्डेवार

राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन झालेले. एक मुलगा आणि दोन मुली. दोन्ही मुलींचे लग्न उरकून आईने आपले कर्तव्य सांभाळले. एकुलता एक मुलगा आईसह कुटुंबाचाच आधार झाला. मात्र, रेल्वे पोलिसांच्या कोठडीत त्याचाही मृत्यू झाल्याचे ऐकताच या आईचे विश्वच अंधकारमय झाले. मुले आई-वडिलांचे छत्र गमावल्याने पोरकी होतात, हे ऐकले होते. मात्र, विरूर स्टेशन येथील ही आईच शासनाच्याच यंत्रणेमुळे पोरकी झाली आहे.

राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या विमल गणपत मडावी या असाहाय मातेची ही कथा. तिला अरुणा आणि अश्विनी अशा दोन मुली आणि अनिल नावाचा एक मुलगा. मुले लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. आई विमलने मोलमजुरी करून मुलांना शिकविले. दहावीपर्यंत शिकल्यानंतर मुलगा अनिल याने संसाराचा गाडा खांद्यावर घेतला. तो काम करून कुटुंबाला हातभार लावू लागला. अशातच दोन्ही मुलींचे लग्नही विमल मडावी यांनी उरकले. एकीला गावातच, तर दुसरीला चित्तूर येथे दिले. दरम्यान, अचानक काही रेल्वे पोलीस येतात आणि अनिल आणि गावातील तीन मुलांना उचलून नेतात. आई मुलगा कुठं गेला म्हणून इथेतिथे शोध घेऊ लागते. तीन दिवसांनंतर चित्तूर येथे राहणाऱ्या बहिणीला रेल्वे पोलीस फोन करून आधार कार्ड मागतात आणि दुसऱ्या दिवशी भाऊ अनिलसुद्धा बहिणीसोबत बोलतो. मला खूप मारत आहेत, मला वाचवा, असेही तो आपल्या बहिणीला सांगतो. अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल मरण पावल्याचा निरोप पोलिसांकडून येतो. फिल्मी स्टाइल वाटावा, असा हा घटनाक्रम असला तरी या घटनेने आई विमलचे विश्वच हादरले. मुलाने काय केले, मुलाचा मृत्यू कशाने झाला, कुठलाही आजार नसताना पोलीस मुलाला फिट आल्याचे का सांगतात, असे नानाविध प्रश्न या आईच्या मनात घोंगावत आहेत. यात दोष कुणाचा, हे सीआयडीच्या तपासात समोर येईलच. मात्र, पतीचे निधन, मुलींचे लग्न झाल्यानंतर एकमेव आधार असलेल्या मुलाचाही असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही आईच पोरकी झाली आहे.

बॉक्स

मृतदेह पाहून अश्रू अनावर

मुलाचा मृतदेह आई विमल मडावी यांच्या समोर आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. मुलाच्या हातावर जखमा होत्या. हात चिरलेले होते. पायावर मारण्याच्या जखमा होत्या. मांडीवर काळे डाग होते, असे खुद्द ही आईच सांगते. मुलाला मरताना किती वेदना झाल्या असतील, याचा विचार करून ही माता सुन्न झाली आहे.