शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

पतीनंतर कर्ता मुलगाही गमावल्याने ‘आई’च झाली पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष बी.यू. बोर्डेवार राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन ...

मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष

बी.यू. बोर्डेवार

राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन झालेले. एक मुलगा आणि दोन मुली. दोन्ही मुलींचे लग्न उरकून आईने आपले कर्तव्य सांभाळले. एकुलता एक मुलगा आईसह कुटुंबाचाच आधार झाला. मात्र, रेल्वे पोलिसांच्या कोठडीत त्याचाही मृत्यू झाल्याचे ऐकताच या आईचे विश्वच अंधकारमय झाले. मुले आई-वडिलांचे छत्र गमावल्याने पोरकी होतात, हे ऐकले होते. मात्र, विरूर स्टेशन येथील ही आईच शासनाच्याच यंत्रणेमुळे पोरकी झाली आहे.

राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या विमल गणपत मडावी या असाहाय मातेची ही कथा. तिला अरुणा आणि अश्विनी अशा दोन मुली आणि अनिल नावाचा एक मुलगा. मुले लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. आई विमलने मोलमजुरी करून मुलांना शिकविले. दहावीपर्यंत शिकल्यानंतर मुलगा अनिल याने संसाराचा गाडा खांद्यावर घेतला. तो काम करून कुटुंबाला हातभार लावू लागला. अशातच दोन्ही मुलींचे लग्नही विमल मडावी यांनी उरकले. एकीला गावातच, तर दुसरीला चित्तूर येथे दिले. दरम्यान, अचानक काही रेल्वे पोलीस येतात आणि अनिल आणि गावातील तीन मुलांना उचलून नेतात. आई मुलगा कुठं गेला म्हणून इथेतिथे शोध घेऊ लागते. तीन दिवसांनंतर चित्तूर येथे राहणाऱ्या बहिणीला रेल्वे पोलीस फोन करून आधार कार्ड मागतात आणि दुसऱ्या दिवशी भाऊ अनिलसुद्धा बहिणीसोबत बोलतो. मला खूप मारत आहेत, मला वाचवा, असेही तो आपल्या बहिणीला सांगतो. अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल मरण पावल्याचा निरोप पोलिसांकडून येतो. फिल्मी स्टाइल वाटावा, असा हा घटनाक्रम असला तरी या घटनेने आई विमलचे विश्वच हादरले. मुलाने काय केले, मुलाचा मृत्यू कशाने झाला, कुठलाही आजार नसताना पोलीस मुलाला फिट आल्याचे का सांगतात, असे नानाविध प्रश्न या आईच्या मनात घोंगावत आहेत. यात दोष कुणाचा, हे सीआयडीच्या तपासात समोर येईलच. मात्र, पतीचे निधन, मुलींचे लग्न झाल्यानंतर एकमेव आधार असलेल्या मुलाचाही असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही आईच पोरकी झाली आहे.

बॉक्स

मृतदेह पाहून अश्रू अनावर

मुलाचा मृतदेह आई विमल मडावी यांच्या समोर आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. मुलाच्या हातावर जखमा होत्या. हात चिरलेले होते. पायावर मारण्याच्या जखमा होत्या. मांडीवर काळे डाग होते, असे खुद्द ही आईच सांगते. मुलाला मरताना किती वेदना झाल्या असतील, याचा विचार करून ही माता सुन्न झाली आहे.