शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

पतीनंतर कर्ता मुलगाही गमावल्याने ‘आई’च झाली पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष बी.यू. बोर्डेवार राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन ...

मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष

बी.यू. बोर्डेवार

राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन झालेले. एक मुलगा आणि दोन मुली. दोन्ही मुलींचे लग्न उरकून आईने आपले कर्तव्य सांभाळले. एकुलता एक मुलगा आईसह कुटुंबाचाच आधार झाला. मात्र, रेल्वे पोलिसांच्या कोठडीत त्याचाही मृत्यू झाल्याचे ऐकताच या आईचे विश्वच अंधकारमय झाले. मुले आई-वडिलांचे छत्र गमावल्याने पोरकी होतात, हे ऐकले होते. मात्र, विरूर स्टेशन येथील ही आईच शासनाच्याच यंत्रणेमुळे पोरकी झाली आहे.

राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या विमल गणपत मडावी या असाहाय मातेची ही कथा. तिला अरुणा आणि अश्विनी अशा दोन मुली आणि अनिल नावाचा एक मुलगा. मुले लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. आई विमलने मोलमजुरी करून मुलांना शिकविले. दहावीपर्यंत शिकल्यानंतर मुलगा अनिल याने संसाराचा गाडा खांद्यावर घेतला. तो काम करून कुटुंबाला हातभार लावू लागला. अशातच दोन्ही मुलींचे लग्नही विमल मडावी यांनी उरकले. एकीला गावातच, तर दुसरीला चित्तूर येथे दिले. दरम्यान, अचानक काही रेल्वे पोलीस येतात आणि अनिल आणि गावातील तीन मुलांना उचलून नेतात. आई मुलगा कुठं गेला म्हणून इथेतिथे शोध घेऊ लागते. तीन दिवसांनंतर चित्तूर येथे राहणाऱ्या बहिणीला रेल्वे पोलीस फोन करून आधार कार्ड मागतात आणि दुसऱ्या दिवशी भाऊ अनिलसुद्धा बहिणीसोबत बोलतो. मला खूप मारत आहेत, मला वाचवा, असेही तो आपल्या बहिणीला सांगतो. अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल मरण पावल्याचा निरोप पोलिसांकडून येतो. फिल्मी स्टाइल वाटावा, असा हा घटनाक्रम असला तरी या घटनेने आई विमलचे विश्वच हादरले. मुलाने काय केले, मुलाचा मृत्यू कशाने झाला, कुठलाही आजार नसताना पोलीस मुलाला फिट आल्याचे का सांगतात, असे नानाविध प्रश्न या आईच्या मनात घोंगावत आहेत. यात दोष कुणाचा, हे सीआयडीच्या तपासात समोर येईलच. मात्र, पतीचे निधन, मुलींचे लग्न झाल्यानंतर एकमेव आधार असलेल्या मुलाचाही असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही आईच पोरकी झाली आहे.

बॉक्स

मृतदेह पाहून अश्रू अनावर

मुलाचा मृतदेह आई विमल मडावी यांच्या समोर आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. मुलाच्या हातावर जखमा होत्या. हात चिरलेले होते. पायावर मारण्याच्या जखमा होत्या. मांडीवर काळे डाग होते, असे खुद्द ही आईच सांगते. मुलाला मरताना किती वेदना झाल्या असतील, याचा विचार करून ही माता सुन्न झाली आहे.