शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पतीनंतर कर्ता मुलगाही गमावल्याने ‘आई’च झाली पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष बी.यू. बोर्डेवार राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन ...

मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष

बी.यू. बोर्डेवार

राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन झालेले. एक मुलगा आणि दोन मुली. दोन्ही मुलींचे लग्न उरकून आईने आपले कर्तव्य सांभाळले. एकुलता एक मुलगा आईसह कुटुंबाचाच आधार झाला. मात्र, रेल्वे पोलिसांच्या कोठडीत त्याचाही मृत्यू झाल्याचे ऐकताच या आईचे विश्वच अंधकारमय झाले. मुले आई-वडिलांचे छत्र गमावल्याने पोरकी होतात, हे ऐकले होते. मात्र, विरूर स्टेशन येथील ही आईच शासनाच्याच यंत्रणेमुळे पोरकी झाली आहे.

राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या विमल गणपत मडावी या असाहाय मातेची ही कथा. तिला अरुणा आणि अश्विनी अशा दोन मुली आणि अनिल नावाचा एक मुलगा. मुले लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. आई विमलने मोलमजुरी करून मुलांना शिकविले. दहावीपर्यंत शिकल्यानंतर मुलगा अनिल याने संसाराचा गाडा खांद्यावर घेतला. तो काम करून कुटुंबाला हातभार लावू लागला. अशातच दोन्ही मुलींचे लग्नही विमल मडावी यांनी उरकले. एकीला गावातच, तर दुसरीला चित्तूर येथे दिले. दरम्यान, अचानक काही रेल्वे पोलीस येतात आणि अनिल आणि गावातील तीन मुलांना उचलून नेतात. आई मुलगा कुठं गेला म्हणून इथेतिथे शोध घेऊ लागते. तीन दिवसांनंतर चित्तूर येथे राहणाऱ्या बहिणीला रेल्वे पोलीस फोन करून आधार कार्ड मागतात आणि दुसऱ्या दिवशी भाऊ अनिलसुद्धा बहिणीसोबत बोलतो. मला खूप मारत आहेत, मला वाचवा, असेही तो आपल्या बहिणीला सांगतो. अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल मरण पावल्याचा निरोप पोलिसांकडून येतो. फिल्मी स्टाइल वाटावा, असा हा घटनाक्रम असला तरी या घटनेने आई विमलचे विश्वच हादरले. मुलाने काय केले, मुलाचा मृत्यू कशाने झाला, कुठलाही आजार नसताना पोलीस मुलाला फिट आल्याचे का सांगतात, असे नानाविध प्रश्न या आईच्या मनात घोंगावत आहेत. यात दोष कुणाचा, हे सीआयडीच्या तपासात समोर येईलच. मात्र, पतीचे निधन, मुलींचे लग्न झाल्यानंतर एकमेव आधार असलेल्या मुलाचाही असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही आईच पोरकी झाली आहे.

बॉक्स

मृतदेह पाहून अश्रू अनावर

मुलाचा मृतदेह आई विमल मडावी यांच्या समोर आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. मुलाच्या हातावर जखमा होत्या. हात चिरलेले होते. पायावर मारण्याच्या जखमा होत्या. मांडीवर काळे डाग होते, असे खुद्द ही आईच सांगते. मुलाला मरताना किती वेदना झाल्या असतील, याचा विचार करून ही माता सुन्न झाली आहे.