शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

युतीपाठोपाठ आघाडीही फिस्कटली

By admin | Updated: February 1, 2017 00:27 IST

जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होईल, असे वातावरण असतानाच युतीपाठोपाठ आघाडीही फिस्कटली आहे.

स्वबळाचा गजर : आज सर्वांचे उमेदवार कळणार, नामांकन दाखल करण्याचा आज अंतिम दिवसचंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होईल, असे वातावरण असतानाच युतीपाठोपाठ आघाडीही फिस्कटली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असून तशी तयारीही सुरू झाली आहे.शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी पाऊण महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेवून आपली स्वबळाची भूमिका जाहीर केली होती. नंतरच्या घटनाक्रमात मुंबई आणि ठाणे येथील महानगर पालिकांसंदर्भातील वरिष्ठ पातळीवरील बोलणी फिस्कटल्याने युती तुटली. या निर्णयाचा ढोल-ताशे वाजवून शिवसेनेने केलेल्या स्वागतामुळे भाजपाच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच उमेदवार निश्चित होऊनही काँग्रेससह शिवसेनेवर मात करण्यासाठी भाजपाचे उमेदवार जाहीर होण्यास विलंब् ा होत आहे. असे असले तरी, तयारीला लागण्याचे आदेश मिळालेले उमेदवार आपआपल्या क्षेत्रात जावून कामाला लागल्याने राजकीय हवा तयार झाली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन आघाडीने लढतील ,असा कार्यकर्त्यांचा अंदाज आणि अपेक्षा होती. त्या दृष्टीने जिल्ह्यातील उभयपक्षातील नेत्यांनी एकत्र येवून बोलणी केली होती. मुंबईला या विषयावर दोनदा चर्चेच्या फेऱ्याही झाल्या होत्या. मात्र अखेर राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील केवळ दोन जागांवरील वादामुळे आघाडीतही बिघाडी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज चंद्रपुरात बैठक घेवून उमेदवारांसाठी एबी फॉर्म वाटप केले. जिल्हा परिषदेसोबच पंचायत समितीसाठी उमेदवारांची निश्चिती मंगळवारी सायंकाळी अखेरच्या टप्प्यात होती. दरम्यान, उद्या बुधवारी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची यादी मतदारांसमोर येणार आहे. उद्या नामनिर्देशनपत्र भरण्यासाठीही गर्दी उसळण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)एकमत झाले असते तर दोघांनाही फायदा -नरेश पुगलिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांची या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, आघाडीच्या निर्णयावर एकमत झाले असते तर दोघांचाही फायदाच होता. आघाडी व्हावी अशी आपली इच्छा होती. मात्र काही कारणास्तव होऊ शकली नाही. दोन्ही बाजुंकडून आघाडीबाबत एकमत झाले असते तर बरे झाले असते.आघाडी तुटणे दुर्दैवी -देवतळेया संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा ग्रामीण काँगे्रस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे म्हणाले, आघाडी तुटण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. आम्ही १२ जागा देऊ केल्या होत्या. तर, ते १४ जागांवर ठाम होते. त्यावर तडजोड होऊ शकली नाही. आघाडी झाली असती तर दोघांनाही त्याचा फायदाच झाला असता.स्वबळाचा निर्णय २५ जानेवारीलाच -गड्डमवारया संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार म्हणाले, आघाडी तुटल्याचे २५ जानेवारीच्या सायंकाळीच जवळपास स्पष्ट झाले होते. मुंबईतील बैठकीत आम्ही काँग्रसकडे २२ जागांसाठी नावे दिली होती. त्यापैकी १३ नावे निश्चितही झाली होती. केवळ ३-४ जागांसाठी ओढाताण सुरू होती. राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील या दोन जागांवरून बरीच ओढाताण झाली. आम्ही या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचा आणि अन्य सर्व ठिकाणी आघाडी करण्याचाही प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांना दिला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीन नसल्याने आघाडी तुटली आहे. स्वबळवार लढण्याचा निर्णय झाल्यामुळे आता आघाडीचा प्रश्नच उरला नसल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, काँग्रेसची आधीपासूनच आघाडीची मानसिकता नव्हती. केवळ या मुद्यावरून त्यांनी वेळकाढू धोरण अवलंबले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सर्व ठिकाणी एबी फॉर्मही वाटले आहेत. त्याचा अर्थ स्पष्ट असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात सर्व ठिकाणच्या जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार उभे राहणार असून सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक ठिकाणचे एबी फॉर्म वितरित झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.