शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

आश्वासनानंतर उपोषण घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:43 IST

तालुक्यातील गडचांदूर येथे गडचांदूरचा विकास हेच आमचे ध्येय या संघटनेचे अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी गांधी जयंतीपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले होते. प्रशासनाच्या समाधानकारक उत्तरामुळे शुक्रवारी महालिंग कंठाळे यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील गडचांदूर येथे गडचांदूरचा विकास हेच आमचे ध्येय या संघटनेचे अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी गांधी जयंतीपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले होते. प्रशासनाच्या समाधानकारक उत्तरामुळे शुक्रवारी महालिंग कंठाळे यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.गांधी चौकात सुरू असलेल्या या अन्नत्याग सत्याग्रहाच्या माध्यमातून गडचांदूर तालुक्याची मागणी पूर्ण करणे, गडचांदूर बसस्थानकाची निर्मिती करणे, शुद्ध पेयजल योजना राबविणे, गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे, माणिकगड सिमेंट कंपनीने गडचांदूरला दत्तक घेणे, स्थानिकांना रोजगार देणे, कंपनीने काढलेल्या कामगारांना कामावर घेणे, ऐतिहासिक बुद्धभूमी व लंगडा मारुती मंदिर नाल्यावर पूल बांधणे, क्रीडा संकूल व व्यायामशाळेची निर्मिती करणे, ओपन स्पेस व चौकांचे सादरीकरण करणे, अतिक्रमणधारकांना नियमित पट्टे देणे, सांस्कृतिक भवन व सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करणे, गडचांदूर येथे उपविभागीय पोलीस कार्यालय देणे, पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिका देणे, बंगाली कॅम्पचे पूनर्वसन करणे, अपंग व्यक्तींना पाच टक्के निधी व घरकुल योजनेचा लाभ देणे, रेल्वेस्थानक, शीत शवपेटी, घनकचरा प्रकल्प, अग्निशामक दल अशा विविध २२ मागण्या महालिंग कंठाळे महाराज यांनी प्रशासनासमोर ठेवल्या होत्या. तहसीलदार हरीश गाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, ठाणेदार सुनीलसिंग पवार, नगर परिषदेचे गटनेते पापय्या पोन्नमवार, विठ्ठल थिपे, बंडू धोटे, हंसराज चौधरी, रऊफ खान, वजीर खान पठाण, डॉ. प्रवीण लोनगाडगे, संघटनेचे मुख्य संघटक बंडू वैरागडे, संघर्ष समितीचे मुख्य संघटक उद्धव पुरी, विक्रम येरणे इत्यादींच्या उपस्थितीत महालिंग कंठाळे यांना शरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले. अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले असून २६ जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, असे महालिंग कंठाळे यांनी सांगितले.