शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अखेर ‘त्या’ घरकुलाचे बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:23 IST

लाभार्थ्याने घरकूल न बांधताच घरकूल बांधुन पूर्ण झाल्याची नोंद असल्याचा प्रकार जिवती पंचायत समितीत काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत होते. या घरकूल गायब प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करून देण्याला सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देघरकूल चोरी प्रकरण : बांधकाम न करताच बांधल्याची केली होती नोंद

फारूख शेख।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : लाभार्थ्याने घरकूल न बांधताच घरकूल बांधुन पूर्ण झाल्याची नोंद असल्याचा प्रकार जिवती पंचायत समितीत काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत होते. या घरकूल गायब प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करून देण्याला सुरूवात केली आहे.जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथील गुंडेराव भीमू आत्राम, विठ्ठल लटारी नैताम यांना इंदिरा आवास योजने अंतर्गत एक लाख रुपये किंमतीचे घरकूल सन २०१३-१४ या वर्षांत मंजूर झाले. तत्कालीन ग्रामसेवकांनी या लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले कच्चे घर पाडून घरकूल योजनेचे घर बांधण्यास सुरूवात केली व बँकेचे खातेही उघडले. त्यानंतर एका महिन्यानी जिवती पंचायत समितीमध्ये पहिला बिल घेण्यासाठी गेले असता लाभार्थ्यांना धक्काच बसला.शासन दरबारी आपले घरकूल बांधकाम पूर्ण झाले, अशी नोंद असल्याने त्यांना घरकुलाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कच्चे घर पाडल्याने लाभार्थ्यांना परिवारासह उघड्यावरच जीवन जगावे लागत होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने २४ जानेवारीला ‘लाभार्थ्यांचे घरकूल गायब’ असे वृत्त प्रकाशित केले. तेव्हा जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले.तालुका संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रणव बक्शी यांनी त्या लाभार्थ्यांची भेट घेतली. तुम्हाला लवकरच घरकुलाची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानुसार या लाभार्थ्यांना पैसे मिळाले असून घरकूल बांधकामाला लाभार्थ्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.आम्हाला सन २०१३-१४ या वर्षात घरकूल मंजूर झाले. त्यानंतर ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून आम्ही कुळाचे घर पाडून घरातील पाळीव शेळ्या विकून जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर पंचायत समितीत घरकूलाचा पहिला बिल मिळवण्यासाठी गेलो असता, आमचे घरकूल पूर्ण झाल्याची नोंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून कुटुंबासह उघड्यावर जीवन जगत होतो. अनेकदा पंचायत समितीत पत्रव्यवहार केला. पण आमचे कोणीच ऐकत नव्हते. लोकमतने आमची व्यथा मांडताच आज आमचे घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत.- गुडेराव आत्राम, विठ्ठल लटारी नैताम,लाभार्थी, जनकापूर.