शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रसायनयुक्त पाणी झाले बंद

By admin | Updated: November 17, 2015 01:58 IST

शुक्रवारी बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे नदी काळवंडली व नदीतील शेकडो मासे

सास्ती : शुक्रवारी बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे नदी काळवंडली व नदीतील शेकडो मासे व जलचर प्राणी मृत्युच्या छायेत असल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच, प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी सुरू केली असून सदर घटनेची पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली असून पोलीस यंत्रणाही चौकशीला लागली असल्याने नेमकी काय कारवाई होईल, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.प्राप्त माहितीनुसार १३ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर पेपर मिलमधील रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्या गेल्यामुळे नदी काळवंडली. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर नदीतील जलचर प्राणी मृत्युच्या छायेत आहे. या पाण्यामुळे परिसरातील पशुधनही धोक्यात आले आहे तर सदर पाणी शेतीला दिल्यामुळे शेतीचेही नुकसान होत आहे. वर्धा नदीवरुन अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा होत असल्यामुळे मानवजातीलाही धोका निर्माण झाला.या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासकीय यंत्रणा सरसावली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने चौकशी सुरु केली आहे. तर पोलीसातही तक्रार झाली असन तपास सुरू आहे तर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली गेली असून यावेळी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनावर नेमकी कोणती कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)पेपर मिल व्यवस्थापनानेही घेतली दखलपेपर मिलच्या ईपी प्लांटमध्ये बिघाड आल्याने दुरुस्तीचे काम सुरू केले होते. त्या दरम्यान रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्या गेले त्यामुळे अशी घटना घडली. परंतू लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच पेपर मिल व्यवस्सथापनाने दखल घेत सदर प्लांट दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. मोठ्या प्रमाणात कामगार वापरून सदर काम पूर्ण केले असून सध्या ईपी प्लांट दुरुस्त झाल्याने रसायनयुक्त पाणी नदीत येणे बंद झाले आहे. आणखी काही दिवस हे काम सुरू असते तर मात्र मोठी हाणी झाली असती. व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.पोलिसात तक्रार दाखलवर्धा नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्या गेल्यामुळे होणाऱ्या दुष्परीणामाकडे बघता बल्लारपूरचे माजी नगरसेवक तथा भाजयुमोर्चा चे माजी जिल्हा सरचिटणीस निलेश खरबडे यांनी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाविरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिळसकर यांनी चौकशी सुरू केली आहे.