शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अखेर रसायनयुक्त पाणी झाले बंद

By admin | Updated: November 17, 2015 01:58 IST

शुक्रवारी बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे नदी काळवंडली व नदीतील शेकडो मासे

सास्ती : शुक्रवारी बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे नदी काळवंडली व नदीतील शेकडो मासे व जलचर प्राणी मृत्युच्या छायेत असल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच, प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी सुरू केली असून सदर घटनेची पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली असून पोलीस यंत्रणाही चौकशीला लागली असल्याने नेमकी काय कारवाई होईल, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.प्राप्त माहितीनुसार १३ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर पेपर मिलमधील रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्या गेल्यामुळे नदी काळवंडली. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर नदीतील जलचर प्राणी मृत्युच्या छायेत आहे. या पाण्यामुळे परिसरातील पशुधनही धोक्यात आले आहे तर सदर पाणी शेतीला दिल्यामुळे शेतीचेही नुकसान होत आहे. वर्धा नदीवरुन अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा होत असल्यामुळे मानवजातीलाही धोका निर्माण झाला.या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासकीय यंत्रणा सरसावली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने चौकशी सुरु केली आहे. तर पोलीसातही तक्रार झाली असन तपास सुरू आहे तर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली गेली असून यावेळी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनावर नेमकी कोणती कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)पेपर मिल व्यवस्थापनानेही घेतली दखलपेपर मिलच्या ईपी प्लांटमध्ये बिघाड आल्याने दुरुस्तीचे काम सुरू केले होते. त्या दरम्यान रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्या गेले त्यामुळे अशी घटना घडली. परंतू लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच पेपर मिल व्यवस्सथापनाने दखल घेत सदर प्लांट दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. मोठ्या प्रमाणात कामगार वापरून सदर काम पूर्ण केले असून सध्या ईपी प्लांट दुरुस्त झाल्याने रसायनयुक्त पाणी नदीत येणे बंद झाले आहे. आणखी काही दिवस हे काम सुरू असते तर मात्र मोठी हाणी झाली असती. व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.पोलिसात तक्रार दाखलवर्धा नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्या गेल्यामुळे होणाऱ्या दुष्परीणामाकडे बघता बल्लारपूरचे माजी नगरसेवक तथा भाजयुमोर्चा चे माजी जिल्हा सरचिटणीस निलेश खरबडे यांनी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाविरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिळसकर यांनी चौकशी सुरू केली आहे.