शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागातील अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 12, 2015 03:39 IST

वनविभागाच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर

कुटुंबाची वाताहत : १५ वर्षांपासून नोकरीसाठी सुरू आहे संघर्षकोठारी : वनविभागाच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याची तरतूद राज्य शासनाकडे आहे. मात्र मागील १५ वर्षापासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत ताटकळत आहेत. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अनुकंपाधारकाच्या समायोजनावर निर्णय घेण्याची मागणी सुनील बोनगिरवार व अनुकंपाधारकांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.अनुकंपाधारकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवली जात होती. त्यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश असल्यामुळे अनुकंपाधारकांना नोकरीत संधी मिळण्यासाठी पाच ते दहा वर्षाचा कार्यकाळ लागत असल्याने शासनाने नियुक्ती करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. मात्र त्यातही अनुकंपाधारकांची फरफट आजपर्यंत सुरु आहे. शासनाने अनुकंपाधारकांना नोकरीत घेण्यासाठी पाच टक्के कोटा करुन त्यात सेवानिवृत्त अथवा मुत्यूने रिक्त होणाऱ्या पदासाठी ठेवला. त्यात सुधारणा करुन पाच टक्यावरुन आता १० टक्के कोटा निर्धारित करण्यात आला.सध्या अनुकंपाधारक अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अतिदुर्गम भागात जीवन जगत आहेत. २००० पासून एकही अनुकंपाधारकास नोकरीवर घेण्यात आले नाही. कुटुंबाचा गाडा हाकताना त्याची मोठी कसरत होत आहे. मोलमजुरी करुन कुटुंबाची उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होत असताना मनात केवळ एकच आशा ‘आज नाहीतर उद्या नोकरीची संधी मिळणार व कुटुंबाची होणारी वाताहत थांबणार’ असते. मात्र १५ वर्ष लोटून गेले तरी नोकरी न मिळाल्याने मनात निराशा असून जीवन मरणाचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.शासनाने २०१४ ला नवा अध्यादेश काढून वनरक्षक पदासाठी विज्ञानात बारावी उत्तीर्ण पात्रतेची अट घातली. ती अट अनुकंपाधारकांसाठी लावण्यात आली. मात्र वनविभागात कार्यरत कर्मचारी ग्रामीण भागात व अतिदुर्गम भागात असल्याने ते आपल्या पाल्यांना विज्ञान शाखेतून शिक्षण देवू शकले नाही. अशात अनुकंपाधारकावर वरील अट अन्यायकारक ठरत आहे. नोकरीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. वनविभागात लिपीक, वनरक्षक ही क गट संवर्गातील व चौकीदार, शिपाई, माळी संवर्गातील पदे अत्यंत कमी आहेत. दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदावर १० टक्के पदे एक किंवा दोन असतात. तेव्हा १५० अनुकंपाधारकांना नोकरीवर संधी मिळविण्यासाठी २० ते २५ वर्ष लागू शकतात. तोपर्यंत त्याची वयोमर्यादा पार झाली असणार. अशावेळी नोकरीवर संधी मिळणे धूसर होणार आहे.अनुकंपाधारकांना सरळसेवेत प्राधान्य देण्यात यावे. वनरक्षक भरतीसाठी १२ वी विज्ञान शाखेची अट शिथिल करण्यात यावी व अनुकंपाधारकांना नोकरीत संधी देण्याची कार्यवाही त्वरित सुरू करावी, अशी मागणी सुनिल बोनगिरवार यांच्यासह अनुकंपाधारकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. अनुकंपाधारकांना शासनाने नोकरीत सामावून घेण्यासाठी कार्यवाही करण्यापेक्षा त्यांना दूर करण्याकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. नवनवीन अटी निर्माण करुन अन्याय करीत आहे. यामुळे अनुकंपाधारकांत तीव्र संताप पसरला असून निराशा पसरल्याने त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे सुनिल बोनगिरवार यांनी म्हटले आहे.