शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

आदिवासी पुरवणी अर्थसंकल्पात विदर्भातील चार जिल्ह्यांना खो

By admin | Updated: January 23, 2016 01:21 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या ८ डिसेंबरला घोषित झालेल्या २०१५-१६ च्या पुरवणी अर्थसंकल्पात

एकही काम नाही : मंत्री विदर्भाचे; पण काय कामाचे ?चंद्रपूर : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या ८ डिसेंबरला घोषित झालेल्या २०१५-१६ च्या पुरवणी अर्थसंकल्पात राज्य मार्ग निधी अंतर्गत मंजूर कामाच्या यादीतून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती हे जिल्हेच गायब झाले आहेत.विदर्भाचा सर्वांगीण विकास करू असे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला पुरवणी अर्थसंकल्पात विदर्भाचाच विसर पडला आहे. वरील चार जिल्ह्यांना एकही काम देण्यात आले नाही. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास मंत्री विदर्भाचे असूनही काय कामाचे, असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे.यापूर्वी १३ जुलै २०१५ च्या आदिवासी विकास विभागाच्या पुरवणी अर्थ संकल्पात ६५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु त्यातून चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती या तीनही जिल्ह्यांसाठी निधीची तरतूद शुन्य होती. आताही पुन्हा तोच अन्याय भाजप सरकारने विदर्भावर केला आहे. २०१५-१६ च्या पुरवणी अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे ५४३ कामे मंजूर करून त्यासाठी ३८ कोटी ४७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे तर नुकत्याच झालेल्या पालघर जिल्ह्याला २११ कामे मंजुर झाली असून २२ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. विशेष म्हणजे, आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांचा हा जिल्हा आहे. यामुळे विदर्भावरील अन्याय स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे.नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात ८ डिसेंबर २०१५ रोजी मांडलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागाच्या राज्य मार्ग निधी अंतर्गत १३८ कोटी ४४ लाख १८ हजार एवढ्या रकमेची ८८१ कामे मंजूर झाली. या निधीतून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील जिल्ह्यात रस्ते, पुल व डांबरीकरण होणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व अमरावती या आदिवासी उपयोजना समाविष्ठ असलेले जिल्हे पूर्णत: कोरडे राहिले असून एकही काम मंजुर झाले नाही. प्रत्येक जिल्ह्यात समप्रमाणात किमान दहा कोटी ६५ लाख रुपयांच्या कामाची तरतूद वाट्याला आली असती. परंतु तसे केले नाही. विदर्भाच्या आदिवासी राखीव क्षेत्रातून व बहुसंख्येने आदिवासी असलेल्या मतदारसंघातून विधानसभा व भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आले असताना आणि सत्तारुढ असताना हे मंत्री व आमदार कोणत्या कामाचे, असा संतप्त सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती, राम नेवले, अ‍ॅड. नंदा पराते, अरुण केदार आदींनी उपस्थित केला आहे. (शहर प्रतिनिधी)