शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

आदिवासींच्या योजनांची योग्य अमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:52 IST

आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना आदिवासी शिष्टमंडळानी दिले.

ठळक मुद्देविष्णू सावरा यांना निवेदन : आदिवासी बांधवांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना आदिवासी शिष्टमंडळानी दिले.वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आले असता आदिवासी बांधवानी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागण्यांच्या निवेदन दिले. दरम्यान या समस्या अल्पवधीत सोडविल्या नाही तर राज्यभरातील विविध आदिवासी संघटना वरोरा येथे तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशाराही आदिवासी समाज संघटनेचे वरोरा-भद्रावती विभागाचे अध्यक्ष रमेश मेश्राम यांनी निवेदनातून दिला.वरोरा येथे एटीएममधून रक्कम चोरी झालेल्या प्रकरणात सुरक्षारक्षक भूमेश्वर येलके यांनी पोलिसांच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या परिवारांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन सदर प्रकरणाची सीआयडीतर्फे चौकशी करण्यात यावी, शुभांगी उईके मृत्यू प्रकरणात तेथील पोलीस अधिकारी हयगय करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासींचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेत अधिकाºयांकडून गरजू आदिवासींना डावलल्या जाते. त्यामुळे या योजनांची योग्य अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांचे निवेदन ना. विष्णू सावरा यांना देण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ना. सावरा यांनी या मागण्यांचा विचार करुन आपण पाठपुरावा करु, असे आवाहन शिष्टमंडळाला दिले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात रमेश मेश्राम, विलास परचाके, प्रा. उमेश मेश्राम, सुरेश मडावी, हरी कुळसंगे, महादेव सिडाम, शेडमाके, नागोजी सिडाम उपस्थित होते.