शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून नामांकित शाळेत प्रवेशाचे अर्ज प्रलंबित

By admin | Updated: April 9, 2017 00:47 IST

पाच महिन्यांपूर्वी नामांकित शाळेत प्रवेश घेण्यासाठी आदिवासी कोलाम समाजाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

उपविभागीय अधिकारी निष्क्रिय : शेकडो कोलाम आदीवासींना त्रासजिवती : पाच महिन्यांपूर्वी नामांकित शाळेत प्रवेश घेण्यासाठी आदिवासी कोलाम समाजाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु ते अर्ज अद्याप निकाली निघालेले नाहीत. उपविभागीय अधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे कोलाम आदिवासींना त्रास होत आहे.राजुरा , जिवती , कोरपना या तीन तालुक्याचे उपविभागीय अधिकारी मटांडा दयानिधी यांच्याकडे मागील सहा - सात महिन्यांपासून कार्यभार आलेला आहे. एकीकडे शासन आदिवासींची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याठी उपाय योजना करीत आहे. त्याचा एक भाग म्हणून आदिवासींच्या मुलांना नामांकीत शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिवती तालुक्यातील कोलाम बांधवसुद्धा या योजनेचा लाभ घेवून मुलांना चांगला शिक्षण मिळेल व अठराविश्वे दारिद्र्य कमी होईल, अशी आशा बाळगून आहेत. या नामांकीत शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जातीच्या प्रमाणपत्राची अट आहे. त्यामुळे अनेक आदिवासी कोलाम बांधव पाच महिन्यांपासून अर्ज करूनही त्यांच्या मुलांना प्रवेश मिळालेला नाही. याशिवाय इतर विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठीही त्यांनी अर्ज केला आहे. मात्र उपविभागीय अधिकारी दयानिधी यांच्या कारभारामुळे सहा महिन्यांपासून कोणालाही जातीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. दमपूर मोहदा येथील कोलाम महिला ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाली. तिला देण्यात आलेल्या जातीच्या प्रमाणपत्रातील नावात दुरूस्ती करायची आहे. परंतु तो प्रस्तावदेखील चार महिन्यांसूनन टेबलवर धूळखात पडला आहे. त्यामुळे ही ग्रामपंचात सदस्य अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहे.राजुरा उपविभागात १९५० चा पुरावा नसल्याने शासन परिपत्रकाप्रमाणे गृहचौकशी अहवालावर जातीचे प्रमाणपत्र तत्कालीन उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे यांनी शेकडो आदिवासींना दिले. तसेच सीतागुडा या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेवून जाती प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले होते. परंतु विद्यमान उपविभागीय अधिकारी दयानीधी यांनी बजावून ठेवले असल्याने एकाही आदिवासीच्या गृहचौकशी अहवालावर मंडळ अधिकारी सही करण्यास तयार नाही. एकाला सही दिली तर सर्वच येतील आणि साहेबांचे काम वाढेल, अशी उत्तरे मंडळ अधिकारी कडून मिळत आहेत. (तालुका प्रतिनिधी)