शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मुदत संपलेल्या ७५ ग्रामपंचायतींवर पुढील आठवड्यात प्रशासक राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

चंद्रपूर : राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांतील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत येत्या २१ जुलैला संपणार आहे. कोविड महामारीमुळे सार्वत्रिक ...

चंद्रपूर : राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांतील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत येत्या २१ जुलैला संपणार आहे. कोविड महामारीमुळे सार्वत्रिक निवडणुका घेण्याची शक्यताच नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुढील आठवड्यापासून प्रशासक नियुक्तीचा आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी १२ जुलै २०२१ रोजी जारी केला. या निर्णयामुळे निवडणुका लढविण्यासाठी बाशिंग बांधून तयार असणाऱ्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल्याची चर्चा आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. रुग्णसंख्या घटल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शिथिलता देऊन काही निर्बंध कायम आहेत. मात्र, कोरोनाचे अद्याप संकट टळलेले नाही. शिवाय, सरकार व आरोग्य तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी धुळे, नंदुरबार, नागपूर, वाशिम व अकोला जिल्हा परिषदच्या ८५ आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, याच कालावधीत राज्यात कोरोना डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळले. ओबीसी आरक्षणावरूनही राजकीय घुसळण सुरू झाली. आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. परिणामी, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुका रद्द केल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे राजूरा, कोरपना व जिवती तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत संपलेल्या गावांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तसेच शासन निर्णयानुसार प्रशासक नियुक्ती करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी नुकतीच पूर्ण केली. १२ जुलै २०२१ रोजी याबाबतचा आदेश जारी केला. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये दुसऱ्याच दिवशी नियुक्त प्रशासकांनी कारभार हाती घ्यावा, असे निर्देशही दिले आहेत.

मुदत संपणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

कोरपना : बेलगाव, बिबी, चनई, धानोली, दुर्गाडी, जेवरा, कन्हाळगाव, कातलाबोडी, खैरगाव, खिर्डी, कोठोडा बू. लखमापूर, मांडवा, मांगलहिरा, नांदा, पारडी, परसोडा, पिंपळगाव, पिपर्डा, रूपापेठ, सावलहिरा, सोनुर्ली, थुट्रा, उपरवाही, वडगाव, वनसडी

प्रशासकांना सरपंचाचे अधिकार

प्रशासकपदी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीने इतरत्र पदस्थापना झाली असेल त्याठिकाणी त्यांच्या जागेवर बदलीने येणाऱ्यांनी प्रशासक म्हणून आपोआप नेमणूक झाल्याचे गृहीत धरण्यात येईल. रुजू झाल्यानंतर विनाविलंब तसा अहवाल जि.प.ला सादर करावा लागणार आहे. नियुक्त प्रशासकांना निवडणुका होईपर्यंत सरपंचाचे सर्व अधिकार लागू आहेत.

कोट

राजुरा, जिवती व कोरपना तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत २१ ते २५ जुलै २०२१ दरम्यान संपणार आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा आदेश जारी झाला. नियुक्त प्रशासकांनी संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार हाती घेऊन तसा अहवाल पंचायत समितीला सादर करावा लागणार आहे.

-कपिल कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. चंद्रपूर