शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

प्रशासनाने रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:24 IST

भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली.

ठळक मुद्देवडगाव येथील प्रकार : बाल संरक्षण कक्षाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली. त्यामुळे आई-वडीलांनी नियोजित विवाह मोडून मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करून देणार नाही, अशी हमी दिली.गुळगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती दिली. तेव्हा बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.त्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास के. मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह रोखण्यासाठी त्याच कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी यांना विवाहाची माहिती देण्यात आली.घटनास्थळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईन केंद्राचे समन्वयक राजेश भिवदरे, सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, समुपदेशक ज्योती चौधरी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता चंद्रप्रकाश पिंपळकर, जयसेन कसारे, शुभम कायल, चाईल्ड लाईनचे टिम सदस्य, मनोज पाटील, कल्पना फुलझेले आदी दाखल झाले.अल्पवयीन बालिकेच्या घरी भेट देऊन बालिकेच्या आई-वडीलांना होत असलेला विवाह हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार कायद्याने गुन्हा आहे. हा विवाह झाल्यास होणारी शिक्षा व दंडाची माहिती दिली. तसेच समुपदेशन व मार्गदर्शन केले. त्यामुळे बालिकेच्या पालकासह इतर नातेवाईकांनी बाल विवाह थांबविण्यास सहमती दर्शवून बालिकेला १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करून देणार नाही, याची हमी दिली.जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास कोणत्याही नागरिकानी ग्राम, तालुका, जिल्हा बाल संरक्षण समिती तसेच चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.