शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

प्रशासनाने रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:24 IST

भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली.

ठळक मुद्देवडगाव येथील प्रकार : बाल संरक्षण कक्षाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली. त्यामुळे आई-वडीलांनी नियोजित विवाह मोडून मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करून देणार नाही, अशी हमी दिली.गुळगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती दिली. तेव्हा बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.त्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास के. मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह रोखण्यासाठी त्याच कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी यांना विवाहाची माहिती देण्यात आली.घटनास्थळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईन केंद्राचे समन्वयक राजेश भिवदरे, सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, समुपदेशक ज्योती चौधरी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता चंद्रप्रकाश पिंपळकर, जयसेन कसारे, शुभम कायल, चाईल्ड लाईनचे टिम सदस्य, मनोज पाटील, कल्पना फुलझेले आदी दाखल झाले.अल्पवयीन बालिकेच्या घरी भेट देऊन बालिकेच्या आई-वडीलांना होत असलेला विवाह हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार कायद्याने गुन्हा आहे. हा विवाह झाल्यास होणारी शिक्षा व दंडाची माहिती दिली. तसेच समुपदेशन व मार्गदर्शन केले. त्यामुळे बालिकेच्या पालकासह इतर नातेवाईकांनी बाल विवाह थांबविण्यास सहमती दर्शवून बालिकेला १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करून देणार नाही, याची हमी दिली.जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास कोणत्याही नागरिकानी ग्राम, तालुका, जिल्हा बाल संरक्षण समिती तसेच चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.