शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

प्रशासनाने रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:24 IST

भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली.

ठळक मुद्देवडगाव येथील प्रकार : बाल संरक्षण कक्षाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली. त्यामुळे आई-वडीलांनी नियोजित विवाह मोडून मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करून देणार नाही, अशी हमी दिली.गुळगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती दिली. तेव्हा बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.त्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास के. मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह रोखण्यासाठी त्याच कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी यांना विवाहाची माहिती देण्यात आली.घटनास्थळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईन केंद्राचे समन्वयक राजेश भिवदरे, सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, समुपदेशक ज्योती चौधरी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता चंद्रप्रकाश पिंपळकर, जयसेन कसारे, शुभम कायल, चाईल्ड लाईनचे टिम सदस्य, मनोज पाटील, कल्पना फुलझेले आदी दाखल झाले.अल्पवयीन बालिकेच्या घरी भेट देऊन बालिकेच्या आई-वडीलांना होत असलेला विवाह हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार कायद्याने गुन्हा आहे. हा विवाह झाल्यास होणारी शिक्षा व दंडाची माहिती दिली. तसेच समुपदेशन व मार्गदर्शन केले. त्यामुळे बालिकेच्या पालकासह इतर नातेवाईकांनी बाल विवाह थांबविण्यास सहमती दर्शवून बालिकेला १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करून देणार नाही, याची हमी दिली.जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास कोणत्याही नागरिकानी ग्राम, तालुका, जिल्हा बाल संरक्षण समिती तसेच चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.