शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आदिलाबाद मार्ग बनला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:27 IST

गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडचांदुरात दररोज घडतात अपघात : चौकात गतिरोधक आवश्यक

ऑनलाईन लोकमतगडचांदूर : गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. यावर करोडो रुपये खर्च केले आहे. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरु असते. मात्र या मार्गावर गतिरोधक नसल्याने येथे दररोज किरकोळ व मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा महामार्ग धोक्याचा बनला आहे.या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बस स्टँड) व बाबुराव शेडमाके चौक (सावित्रीबाई फुले विद्यालय जवळ) गतीरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. विद्यालयीन तथा महाविद्यालयीन अल्पवयीन मुले भरधाव मोटार सायकल चालवित असल्याने दररोज अपघात घडत आहेत.२१ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले शाळेजवळ याच शाळेचे शिक्षक राजेश मांढरे सकाळी शाळेत येत असताना भरधाव येणाºया मोटारसायकलने त्यांना उडविले. विशेष म्हणजे मोटारसायकलस्वार अल्पवयीन विद्यार्थी असून त्यांच्याकडे परवानासुद्धा नव्हता, असे कळते. शिक्षक मांढरे यांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन तिनही चौकात वाहतूक शिपाई नियुक्त करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने तिनही चौकात गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुनील चिंतलवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले असून प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा अपघात घडू शकतो.