शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा पीक विम्यात समावेश करा

By admin | Updated: June 14, 2017 00:24 IST

बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. त्यातील ६ हजार ७६५ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष खरीप हंगामाची लागवड केली जाते. गेल्या वर्षी सर्वाधिक ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात ‘कापूस’ पीक घेतले होते. मात्र शासनाने पीकविमा योजनेतून ‘कापूस’ हद्दपार केला आला आहे. ‘कापूस’ पीक विमा योजनेत समावेश करा, या मागणीला अनुसरुन बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.तालुक्यातील नांदगाव (पोडे), हडस्ती, चारपट, विसापूर, बामणी (दुधोली), दहेली, कळमना, कोर्टिमक्ता, पळसगाव, आमडी, कोठारी व किन्ही गावातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील प्रमुख पीक ‘कापूस’ हेच आहे. याच पिकांवर शेतकऱ्यांचा आर्थिक डोलारा उभा असून बल्लारपूर तालुक्यातच ‘कापूस’ पिकाला पीकविमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बल्लारपूर तालुक्याचा समावेश ‘कापूस’ पीकविमा योजनेत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम यांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ-ठुबे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मागील दशकापासून बल्लारपूर तालुक्यातील शेतकरी कापूस मुख्य पीक म्हणून उत्पादन घेत आहेत. तरीही या पिकाच्या पीकविमा योजनेतून तालुका वगळण्यात आला. त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कृती करून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीक पेऱ्याच्या अहवालानुसार, कापूस ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्र आणि भात पिकाचे २ हजार ९०९.६० हेक्टर क्षेत्र होते. तूर ३७३.३० हेक्टर आणि सोयाबिनचा पेरा घटून ३३३.१० हेक्टर क्षेत्रात होता. बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक पेरणीचे क्षेत्र कापसाचे असताना पीकविमा योजनेतून बाद ठरविण्यात आले.त्यावर शासनाने त्वरित निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निर्णय घेण्यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेवून शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगण्यात आली.