शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

कापसाचा पीक विम्यात समावेश करा

By admin | Updated: June 14, 2017 00:24 IST

बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. त्यातील ६ हजार ७६५ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष खरीप हंगामाची लागवड केली जाते. गेल्या वर्षी सर्वाधिक ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात ‘कापूस’ पीक घेतले होते. मात्र शासनाने पीकविमा योजनेतून ‘कापूस’ हद्दपार केला आला आहे. ‘कापूस’ पीक विमा योजनेत समावेश करा, या मागणीला अनुसरुन बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.तालुक्यातील नांदगाव (पोडे), हडस्ती, चारपट, विसापूर, बामणी (दुधोली), दहेली, कळमना, कोर्टिमक्ता, पळसगाव, आमडी, कोठारी व किन्ही गावातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील प्रमुख पीक ‘कापूस’ हेच आहे. याच पिकांवर शेतकऱ्यांचा आर्थिक डोलारा उभा असून बल्लारपूर तालुक्यातच ‘कापूस’ पिकाला पीकविमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बल्लारपूर तालुक्याचा समावेश ‘कापूस’ पीकविमा योजनेत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम यांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ-ठुबे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मागील दशकापासून बल्लारपूर तालुक्यातील शेतकरी कापूस मुख्य पीक म्हणून उत्पादन घेत आहेत. तरीही या पिकाच्या पीकविमा योजनेतून तालुका वगळण्यात आला. त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कृती करून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीक पेऱ्याच्या अहवालानुसार, कापूस ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्र आणि भात पिकाचे २ हजार ९०९.६० हेक्टर क्षेत्र होते. तूर ३७३.३० हेक्टर आणि सोयाबिनचा पेरा घटून ३३३.१० हेक्टर क्षेत्रात होता. बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक पेरणीचे क्षेत्र कापसाचे असताना पीकविमा योजनेतून बाद ठरविण्यात आले.त्यावर शासनाने त्वरित निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निर्णय घेण्यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेवून शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगण्यात आली.