शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड नगरपरिषद स्थापनेच्या हालचाली सुरू

By admin | Updated: February 3, 2015 22:53 IST

येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या

घनश्याम नवघडे - नागभीडयेत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या स्थापनेबाबत हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार येथील तहसिलदारांनी अहवालही सादर केल्याची माहिती मिळाली आहे.१६ आॅगस्ट २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिमूर येथील कार्यक्रमात चिमूर आणि नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी नगरपरिषद स्थापनेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या.नगर परिषदेसाठी २५ हजार लोकसंख्या ही प्रमुख अट असून या अटीच्या पूर्ततेसाठी नागभीडसह सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसोडी तुकूम या गावांचासुद्धा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही गावे नागभीड नगर परिषदेत समाविष्ट झाली तर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी नगर परिषद ठरणार आहे.सध्या नागभीड येथे १७ सदस्यीय ग्रामपंचायत अस्तित्वात असून या स्वराज्य संस्थेला विकासाच्या दृष्टीने अनेक मर्यादा आहेत. कर आणि बाजार या व्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. या उत्पन्नाचा बराचसा भाग गावातील दिवाबत्ती आणि नाल्यांची सफाई यावर खर्च होतो. रस्ते, नाल्या आणि अन्य विकास कामासाठी ग्रामपंचायतीला आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहावे लागते. सदर लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये पदारुढ असलेल्या पदाधिकाऱ्यांना ‘अनुकूल’ असले तर ठीक नाही तर, सारेच मुसळ केरात. याच परिस्थितीमुळे अनेक ग्रामपंचायती २० वर्षापूर्वी ज्या अवस्थेत होत्या त्याच अवस्थेत आजही आहेत.विश्वसनीय माहितीनुसार चिमूरचे आमदार बंटी भांगडिया हे सुद्धा नागभीड नगर परिषदेसाठी आग्रही आहेत. नागभीड येथे नगर परिषद व्हावी यासाठी त्यांचा जिल्हाधिकारी पातळीवर पत्रव्यवहार सुरू आहे. येत्या आॅगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी नगरपरिषदेची स्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.