शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

नागभीड नगरपरिषद स्थापनेच्या हालचाली सुरू

By admin | Updated: February 3, 2015 22:53 IST

येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या

घनश्याम नवघडे - नागभीडयेत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या स्थापनेबाबत हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार येथील तहसिलदारांनी अहवालही सादर केल्याची माहिती मिळाली आहे.१६ आॅगस्ट २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिमूर येथील कार्यक्रमात चिमूर आणि नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी नगरपरिषद स्थापनेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या.नगर परिषदेसाठी २५ हजार लोकसंख्या ही प्रमुख अट असून या अटीच्या पूर्ततेसाठी नागभीडसह सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसोडी तुकूम या गावांचासुद्धा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही गावे नागभीड नगर परिषदेत समाविष्ट झाली तर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी नगर परिषद ठरणार आहे.सध्या नागभीड येथे १७ सदस्यीय ग्रामपंचायत अस्तित्वात असून या स्वराज्य संस्थेला विकासाच्या दृष्टीने अनेक मर्यादा आहेत. कर आणि बाजार या व्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. या उत्पन्नाचा बराचसा भाग गावातील दिवाबत्ती आणि नाल्यांची सफाई यावर खर्च होतो. रस्ते, नाल्या आणि अन्य विकास कामासाठी ग्रामपंचायतीला आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहावे लागते. सदर लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये पदारुढ असलेल्या पदाधिकाऱ्यांना ‘अनुकूल’ असले तर ठीक नाही तर, सारेच मुसळ केरात. याच परिस्थितीमुळे अनेक ग्रामपंचायती २० वर्षापूर्वी ज्या अवस्थेत होत्या त्याच अवस्थेत आजही आहेत.विश्वसनीय माहितीनुसार चिमूरचे आमदार बंटी भांगडिया हे सुद्धा नागभीड नगर परिषदेसाठी आग्रही आहेत. नागभीड येथे नगर परिषद व्हावी यासाठी त्यांचा जिल्हाधिकारी पातळीवर पत्रव्यवहार सुरू आहे. येत्या आॅगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी नगरपरिषदेची स्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.