शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

नागभीड नगरपरिषद स्थापनेच्या हालचाली सुरू

By admin | Updated: February 3, 2015 22:53 IST

येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या

घनश्याम नवघडे - नागभीडयेत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या स्थापनेबाबत हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार येथील तहसिलदारांनी अहवालही सादर केल्याची माहिती मिळाली आहे.१६ आॅगस्ट २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिमूर येथील कार्यक्रमात चिमूर आणि नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी नगरपरिषद स्थापनेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या.नगर परिषदेसाठी २५ हजार लोकसंख्या ही प्रमुख अट असून या अटीच्या पूर्ततेसाठी नागभीडसह सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसोडी तुकूम या गावांचासुद्धा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही गावे नागभीड नगर परिषदेत समाविष्ट झाली तर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी नगर परिषद ठरणार आहे.सध्या नागभीड येथे १७ सदस्यीय ग्रामपंचायत अस्तित्वात असून या स्वराज्य संस्थेला विकासाच्या दृष्टीने अनेक मर्यादा आहेत. कर आणि बाजार या व्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. या उत्पन्नाचा बराचसा भाग गावातील दिवाबत्ती आणि नाल्यांची सफाई यावर खर्च होतो. रस्ते, नाल्या आणि अन्य विकास कामासाठी ग्रामपंचायतीला आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहावे लागते. सदर लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये पदारुढ असलेल्या पदाधिकाऱ्यांना ‘अनुकूल’ असले तर ठीक नाही तर, सारेच मुसळ केरात. याच परिस्थितीमुळे अनेक ग्रामपंचायती २० वर्षापूर्वी ज्या अवस्थेत होत्या त्याच अवस्थेत आजही आहेत.विश्वसनीय माहितीनुसार चिमूरचे आमदार बंटी भांगडिया हे सुद्धा नागभीड नगर परिषदेसाठी आग्रही आहेत. नागभीड येथे नगर परिषद व्हावी यासाठी त्यांचा जिल्हाधिकारी पातळीवर पत्रव्यवहार सुरू आहे. येत्या आॅगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी नगरपरिषदेची स्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.