शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:56 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई सारख्या संकटावर प्रभावीपणे मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केल्या.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील पाणीटंचाई सारख्या संकटावर प्रभावीपणे मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केल्या. सर्व सोयीसुविधा असताना विविध कारणे दाखवून योजना कार्यान्वित करण्यात शासकीय यंत्रणा निष्क्रीयता दाखवत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांना धारेवर धरून बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला आ. अ‍ॅड. संजय धोटे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, निवासी उपजिल्हाधिकारी नावाडकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गजभे, सनियंत्रण समितीचे सदस्य खुशाल बोंडे, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत व वरोरा, चंद्रपूर, राजुरा व अन्य तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील संवर्ग विकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, जिल्हा दक्षता व पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी ना. अहीर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विषयक योजनांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पेयजल योजनांबाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी या सर्व योजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सुचना त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केली होती.या सूचनेनुसार जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकाºयांच्या मार्फत बंद असलेल्या व विविध कारणाने कार्यान्वित न झालेल्या पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर अहवाल शनिवारच्या आढावा सभेत केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर सादर केला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.