शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे.

फौजदारी कारवाई : निवडणूक आयोगाचे पाऊलचंद्रपूर : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे मतदानासाठी टाळाटाळ करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.निवडणूकीच्या कामात कोतवालापासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळेच व्यस्त असतात. नागरिकांत मतदान जागृती करुन मतदान टक्केवारी वाढविण्याचे दरवर्षी प्रयत्न केले जात आहेत. सामान्य मतदारांची मतदानाची टक्केवारी वाढत असली, तरी प्रशासकीय कर्मचारीच निवडणूूक कामात असताना, मतदान करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोगाने मतदान कामात व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागविली असूून त्यांचे मतदान ओळखपत्र, ओळखपत्र क्रमांक, यादी क्रमांकाची नोंद घेतली आहे. निवडणूक आयोगाचे हे पाऊल मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी असून, मतदान न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मतदान कामात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाकडून इडीसी अर्ज, पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करुन देण्याची कारवाई सुरु आहे. ज्यांना पोस्टर बॅलेट पेपर मिळाले नाही, त्यांना तहसील कार्यालयात बॅलेट पेपर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मतदान करतात की, नाही यावर लक्ष राहणार आहे. आपल्याच कर्मचाऱ्यांकडून मतदान होत नसल्याने निवडणूक आयोगाला फौजदारी कारवाईचे पाऊल उचलावे लागले असल्याचे सांगण्यात येते.(स्थानिक प्रतिनिधी)