शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे.

फौजदारी कारवाई : निवडणूक आयोगाचे पाऊलचंद्रपूर : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे मतदानासाठी टाळाटाळ करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.निवडणूकीच्या कामात कोतवालापासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळेच व्यस्त असतात. नागरिकांत मतदान जागृती करुन मतदान टक्केवारी वाढविण्याचे दरवर्षी प्रयत्न केले जात आहेत. सामान्य मतदारांची मतदानाची टक्केवारी वाढत असली, तरी प्रशासकीय कर्मचारीच निवडणूूक कामात असताना, मतदान करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोगाने मतदान कामात व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागविली असूून त्यांचे मतदान ओळखपत्र, ओळखपत्र क्रमांक, यादी क्रमांकाची नोंद घेतली आहे. निवडणूक आयोगाचे हे पाऊल मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी असून, मतदान न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मतदान कामात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाकडून इडीसी अर्ज, पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करुन देण्याची कारवाई सुरु आहे. ज्यांना पोस्टर बॅलेट पेपर मिळाले नाही, त्यांना तहसील कार्यालयात बॅलेट पेपर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मतदान करतात की, नाही यावर लक्ष राहणार आहे. आपल्याच कर्मचाऱ्यांकडून मतदान होत नसल्याने निवडणूक आयोगाला फौजदारी कारवाईचे पाऊल उचलावे लागले असल्याचे सांगण्यात येते.(स्थानिक प्रतिनिधी)