शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे.

फौजदारी कारवाई : निवडणूक आयोगाचे पाऊलचंद्रपूर : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे मतदानासाठी टाळाटाळ करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.निवडणूकीच्या कामात कोतवालापासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळेच व्यस्त असतात. नागरिकांत मतदान जागृती करुन मतदान टक्केवारी वाढविण्याचे दरवर्षी प्रयत्न केले जात आहेत. सामान्य मतदारांची मतदानाची टक्केवारी वाढत असली, तरी प्रशासकीय कर्मचारीच निवडणूूक कामात असताना, मतदान करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोगाने मतदान कामात व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागविली असूून त्यांचे मतदान ओळखपत्र, ओळखपत्र क्रमांक, यादी क्रमांकाची नोंद घेतली आहे. निवडणूक आयोगाचे हे पाऊल मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी असून, मतदान न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मतदान कामात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाकडून इडीसी अर्ज, पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करुन देण्याची कारवाई सुरु आहे. ज्यांना पोस्टर बॅलेट पेपर मिळाले नाही, त्यांना तहसील कार्यालयात बॅलेट पेपर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मतदान करतात की, नाही यावर लक्ष राहणार आहे. आपल्याच कर्मचाऱ्यांकडून मतदान होत नसल्याने निवडणूक आयोगाला फौजदारी कारवाईचे पाऊल उचलावे लागले असल्याचे सांगण्यात येते.(स्थानिक प्रतिनिधी)