शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

काँग्रेस बंडखोरांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 00:49 IST

येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बल्लारपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या...

विजय वडेट्टीवार : बल्लारपूर पेपर मिलची समस्या मांडणारबल्लारपूर : येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बल्लारपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हा प्रभारी एस.क्यू. झामा यांनी दिला. तसेच यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार यांनी बल्लारपूर पेपर मिलचा प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडण्याची ग्वाही दिली.काँग्रेसच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आ. वडेट्टीवार आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. आ. वडेट्टीवार म्हणाले की, आठ हजार कर्मचाऱ्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न बल्लारपूर पेपर मिलमध्ये आर्थिक संकट आणि वन विभागाकडून मिळत नसलेल्या बांबूमुळे उद्भवला आहे. हा प्रश्न निकाली लागेल, असे समजून आपण गप्प बसलो होतो. पण, आता धीर धरणे शक्य नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तो आपण नेटाने उचलू आणि बांबू या कच्चा मालासंबंधात वनविभाग आणि शासन, पेपर मिलची अडवणूक का करीत आहे, याचा जाब विचारून त्यांना पेपर मिलला बांबू देण्याकरिता भाग पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले. आ. वडेट्टीवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री या विधानसभा क्षेत्राचे आमदार असताना बांबूच्या अडवणुकीचा प्रश्न उद्भवूच नये, असे सांगत राजकारण बाजूला ठेऊन, लोकांच्या पोटापाण्याशी निगडीत समस्या कशा दूर होईल, याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवे. पण, ते झाले नाही ही खेदाची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात विकासाची सर्व कामे आपणच केली अशी बढाई मारत भाजप साऱ्या कामाचे श्रेय घेत सुटले आहे. काम कमी, श्रेयाच्या गोष्टी अधिक असे राज्यात सुरू आहे. भाजपा सर्वत्र चुकीचे धोरण राबवित आहे. त्यामुळे, व्यापारी, कामगार, शेतकरी आज चिंतेत व अडचणीत पडले आहेत. आता, ५०० व एक हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर सामान्य लोक मोठ्या अडचणीत आले आहेत, आरोप वडेट्टीवार यांनी केला.बल्लारपूर नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काही काँग्रेस जणांनी बंडखोरी केली आहे. त्यांचा समाचार घेऊन, त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे जिल्ह्याचे प्रभारी एस.क्यू. झामा म्हणाले. तसेच पेपर मिलचा बांबू प्रश्न लवकर निकाली न निघाल्यास आंदोलन उभारण्यात येईल, असेही झामा यांनी सांगितले. या पत्रपरिषदेत माजी आमदर सुभाष धोटे, काँग्रेसचे नगराध्यक्षाचे उमेदवार वेंकटेश बाल बैरय्या, नगराध्यक्षा छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, रणजीत सिंह अरोरा, देवेंद्र आर्य, जिल्हा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, अश्विनी खोब्रागडे, करीम भाई आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)