शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चंद्रपुरातील सहा दुकानांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या चंद्रपुरातील कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहांवर मनपाच्या पथकाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. उपहारगृहे, खाद्यगृहे यात केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सूचना असताना ग्राहकांना दुकानाच्या आत बसून खाद्यान्न खाऊ दिले जात आहे. बुधवारी मनपाच्या पथकाने शहरातील हॉटेल्सची पाहणी केली.

ठळक मुद्देसात दिवस राहणार बंद : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरावर वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या सहा दुकानांवर मनपाने कारवाई केली. या सहाही दुकानांना पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी स्वत: आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात मनपा पथकाने केली.कोरोना प्रतिबंधासाठी शासनातर्फे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. दरम्यान, परिस्थिती पूर्वपदावर यावी, याकरिता मागील काही दिवसांपासून यात शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेतच दुकाने सुरु ठेवण्यात येत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. एकावेळी पाचपेक्षा अधिक लोकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, दोन ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर पाळावे, विहित वेळेत दुकाने सुरु व बंद करावे, पूर्णत: स्वच्छता राखावी, यासारख्या अटी या लॉकडाऊन शिथिलता काळात पाळण्याचे दुकानदारांवर बंधन आहे. याबाबत मनपातर्फे वारंवार सूचना देण्यात आल्या आहे. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने आयुक्त राजेश मोहिते यांनी काही प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष तपासणी करून कडक कारवाई केली. यावेळी उपायुक्त गजानन बोकडे, आशिष मोरे, राहुल पंचबुद्धे, संतोष गर्गेलवार उपस्थित होते.ग्राहकांना बसू देणाऱ्या उपहारगृहांना दंडग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या चंद्रपुरातील कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहांवर मनपाच्या पथकाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. उपहारगृहे, खाद्यगृहे यात केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सूचना असताना ग्राहकांना दुकानाच्या आत बसून खाद्यान्न खाऊ दिले जात आहे. बुधवारी मनपाच्या पथकाने शहरातील हॉटेल्सची पाहणी केली. यात कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहात ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसले. काही ग्राहक नाश्ता करतानाही दिसून आले. त्यामुळे या दोन्ही उपहारगृहांवर कारवाई करण्यात आली.मनपाची मोहीमकोरोना प्रतिबंधासाठी दक्षता न पाळणाऱ्या व स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवितानाच लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. त्यानुसार विविध नियमांचे भंग करणाऱ्या व इतरांचे आरोग्य धोक्यात आणणाºया व्यक्तींना दंड आकारण्यात येत आहे.लॉकडाऊनमधे शिथिलता ही मंदावलेले आर्थिक चक्र सुरळीत करण्यासाठी दिली गेली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेण्यात येऊ नये. मास्क घालणे, भौतिक दूरता पाळणे यासारख्या नियमांचे पालन व्हायलाच हवे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.- राजेश मोहिते,आयुक्त, मनपा, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या