शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

पाणी पुरवठा योजनेला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:26 IST

खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण झाले.

ठळक मुद्देपाच लाखांचे देयक थकित : महावितरणचा वीज जोडणीला नकार

आॅनलाईन लोकमतकोठारी : खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण झाले. पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा असून वीज वितरण कंपनी पाच लाखांचे थकित वीज देयक भरल्याशिवाय वीज जोडणीस नकार देत असल्याने थेंबभर पाणी मिळण्याअगोदरच पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे.१९८४ ची पाणी पुरवठा योजना ग्रा.पं.च्या अकार्यक्षमतेने दहा वर्षापासून बंद आहे. कोठारीकरांना आठ हातपंपावर अवलंबून राहावे लागते आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याने शासनाने वर्धा नदीवर एक लाख ६० हजार लिटर क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून पूर्ण केली. त्यात वर्धा नदीचे पाणी शुद्धीकरण करुन गावकऱ्यांना पुरविण्याची योजना आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाने योजना पूर्ण करुन आक्टोंबर २०१६ मध्ये त्याची तपासणी केली. ग्रा.पं.च्या निवडणुकीपूर्वी योजनेचे उद्घाटन केले. गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दहा वर्षांच्या संघर्षानंतर आता नळाद्वारे पाणी मिळेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र वीज वितरण कंपनीचे पाच लाख ८० हजार मागील अनेक वर्षापासून ग्रा.पं.कडे थकित आहे. वीज जोडणी केल्याशिवाय योजना सुरु होऊ शकत नाही. महावितरण थकित देयक भरल्याशिवाय वीज जोडणीला नकार देत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे.सध्या उन्हाळा सुरु होण्याच्या तयारीत असून गावकरी पाण्यासाठी आक्रोश करीत आहेत. गावातील आठ हातपंपापैकी अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. हातपंप दुरुस्ती करण्याची जबाबदारी पंचायत समितीची असून त्याकडे तांत्रिक अडचण दाखवून दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गावकऱ्यांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पूर्ण तयार असून मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी होणाऱ्या यातना थांबणार आहे. सध्या गावाची शोभा वाढविण्याºया पाण्याच्या टाकीला व जलशुद्धीकरण केंद्राकडून गावकºयांना पाणी फेब्रुवारी महिन्याअखेर न दिल्यास गावकऱ्यांच्या समक्ष ग्रामपंचायतीला कुलूप ठोकू, असा इशारा तंमुस अध्यक्ष धीरज बांबोडे व ग्रा.पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.येत्या आठ दिवसांच्या आत ग्रा.पं. कडून थकित वीज देयकाचा भरणा करणार असून प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाला त्रुट्या असलेल्या कामाची यादी सादर केली आहे. त्रुट्या पूर्ण झाल्यानंतर व चाचपणीअंती योजना ग्रा.पं. ला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- एकनाथ पिंपळशेंडे, ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं. कोठारी