शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

प्रकल्पग्रस्त ४३ शेतकऱ्यांची ७६ हेक्टर जमीन संपादन मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:46 IST

मे. रत्नागिरी बिल्डींग प्रॉडक्ट लि. या सिमेंट कंपनीद्वारे कोरपना येथील नांदगाव (सूर्या) कवठाळा, भोयगाव, एकोडी येथील ४९६.३४ हे.आर. जमिन २५ जानेवारी १९९५ रोजी करारनामा...

हंसराज अहीर यांचा पाठपुरावा : नांदगाव, भोयगाव, कवठाळा, एकोडीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदचंद्रपूर : मे. रत्नागिरी बिल्डींग प्रॉडक्ट लि. या सिमेंट कंपनीद्वारे कोरपना येथील नांदगाव (सूर्या) कवठाळा, भोयगाव, एकोडी येथील ४९६.३४ हे.आर. जमिन २५ जानेवारी १९९५ रोजी करारनामा करून महाराष्ट्र टेनंन्सी अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर लॅन्ड लॉ अ‍ॅक्ट १९९४ प्रमाणे सिमेंट कंपनी स्थापन करण्यासाठी घेण्यात आली. मात्र या जमिनीचा कंपनीकडून वापर न झाल्याने जवळपास ४३ शेतकऱ्यांची ७६ एकर जमीन परत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे.शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीचा जर ५ वर्षात खरेदी तारखेपासून उपयोग कंपनीद्वारे करण्यात आला नाही तर शेतकऱ्याला ती जमिन व खरेदी केलेल्या दराची रक्कम परत करून जमीन शेतकऱ्यांची होईल, असे करारनाम्यात स्पष्ट नमुद होते. मागील २१ वर्षांपासून या जमिनीचा कंपनीने कुठलाही वापर केला नाही व १९९५ पासून शेतकरी आजतागायत शेती करीत आहे. असे असताना कंपनीने मध्यंतरीच्या काळात ६ शेतकऱ्यांना खरेदी किंमत घेऊन जमीन परत केली. परंतु उर्वरीत जमिन ही कंपनीच्या नावे असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने व खरेदी विक्री करण्यास झाला नाही. केंद्रीय राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी या प्रश्नावर मागील बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा केला व आघाडी सरकारच्या कारकीर्दीत हा प्रश्न सातत्याने लावून धरला. परंतु मागील सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. मात्र ना. हंसराज अहीर यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी २०१४-१५ मध्ये पत्रव्यवहार करून व १६ जून २०१५ रोजी उद्योगमंत्र्यांसोबत बैठक लावून या समस्येचा निकाल लावला. जमिन संपादनमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जमिनी परत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करावी, असा आदेश २३ जुलै रोजी शासनाने निर्गमीत केला आहे. मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव उपविभागीय अधिकारी राजुरा व अंतिमरित्या तहसिलदार कोरपना यांनी १३ जुलै रोजी जमिनीची विक्री करून शेतकऱ्यांना परत केली. ही जमिन शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात केंद्रीय मंत्र्यांना यश आल्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. शेतकऱ्यांनी जमिनीचे सातबारा तातडीने तहसिल कार्यालयातून आपल्या नावे करावे, असे आवाहन भाजप तर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)