शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

प्रकल्पग्रस्त ४३ शेतकऱ्यांची ७६ हेक्टर जमीन संपादन मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:46 IST

मे. रत्नागिरी बिल्डींग प्रॉडक्ट लि. या सिमेंट कंपनीद्वारे कोरपना येथील नांदगाव (सूर्या) कवठाळा, भोयगाव, एकोडी येथील ४९६.३४ हे.आर. जमिन २५ जानेवारी १९९५ रोजी करारनामा...

हंसराज अहीर यांचा पाठपुरावा : नांदगाव, भोयगाव, कवठाळा, एकोडीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदचंद्रपूर : मे. रत्नागिरी बिल्डींग प्रॉडक्ट लि. या सिमेंट कंपनीद्वारे कोरपना येथील नांदगाव (सूर्या) कवठाळा, भोयगाव, एकोडी येथील ४९६.३४ हे.आर. जमिन २५ जानेवारी १९९५ रोजी करारनामा करून महाराष्ट्र टेनंन्सी अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर लॅन्ड लॉ अ‍ॅक्ट १९९४ प्रमाणे सिमेंट कंपनी स्थापन करण्यासाठी घेण्यात आली. मात्र या जमिनीचा कंपनीकडून वापर न झाल्याने जवळपास ४३ शेतकऱ्यांची ७६ एकर जमीन परत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे.शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीचा जर ५ वर्षात खरेदी तारखेपासून उपयोग कंपनीद्वारे करण्यात आला नाही तर शेतकऱ्याला ती जमिन व खरेदी केलेल्या दराची रक्कम परत करून जमीन शेतकऱ्यांची होईल, असे करारनाम्यात स्पष्ट नमुद होते. मागील २१ वर्षांपासून या जमिनीचा कंपनीने कुठलाही वापर केला नाही व १९९५ पासून शेतकरी आजतागायत शेती करीत आहे. असे असताना कंपनीने मध्यंतरीच्या काळात ६ शेतकऱ्यांना खरेदी किंमत घेऊन जमीन परत केली. परंतु उर्वरीत जमिन ही कंपनीच्या नावे असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने व खरेदी विक्री करण्यास झाला नाही. केंद्रीय राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी या प्रश्नावर मागील बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा केला व आघाडी सरकारच्या कारकीर्दीत हा प्रश्न सातत्याने लावून धरला. परंतु मागील सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. मात्र ना. हंसराज अहीर यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी २०१४-१५ मध्ये पत्रव्यवहार करून व १६ जून २०१५ रोजी उद्योगमंत्र्यांसोबत बैठक लावून या समस्येचा निकाल लावला. जमिन संपादनमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जमिनी परत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करावी, असा आदेश २३ जुलै रोजी शासनाने निर्गमीत केला आहे. मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव उपविभागीय अधिकारी राजुरा व अंतिमरित्या तहसिलदार कोरपना यांनी १३ जुलै रोजी जमिनीची विक्री करून शेतकऱ्यांना परत केली. ही जमिन शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात केंद्रीय मंत्र्यांना यश आल्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. शेतकऱ्यांनी जमिनीचे सातबारा तातडीने तहसिल कार्यालयातून आपल्या नावे करावे, असे आवाहन भाजप तर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)