शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त ४३ शेतकऱ्यांची ७६ हेक्टर जमीन संपादन मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:46 IST

मे. रत्नागिरी बिल्डींग प्रॉडक्ट लि. या सिमेंट कंपनीद्वारे कोरपना येथील नांदगाव (सूर्या) कवठाळा, भोयगाव, एकोडी येथील ४९६.३४ हे.आर. जमिन २५ जानेवारी १९९५ रोजी करारनामा...

हंसराज अहीर यांचा पाठपुरावा : नांदगाव, भोयगाव, कवठाळा, एकोडीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदचंद्रपूर : मे. रत्नागिरी बिल्डींग प्रॉडक्ट लि. या सिमेंट कंपनीद्वारे कोरपना येथील नांदगाव (सूर्या) कवठाळा, भोयगाव, एकोडी येथील ४९६.३४ हे.आर. जमिन २५ जानेवारी १९९५ रोजी करारनामा करून महाराष्ट्र टेनंन्सी अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर लॅन्ड लॉ अ‍ॅक्ट १९९४ प्रमाणे सिमेंट कंपनी स्थापन करण्यासाठी घेण्यात आली. मात्र या जमिनीचा कंपनीकडून वापर न झाल्याने जवळपास ४३ शेतकऱ्यांची ७६ एकर जमीन परत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे.शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीचा जर ५ वर्षात खरेदी तारखेपासून उपयोग कंपनीद्वारे करण्यात आला नाही तर शेतकऱ्याला ती जमिन व खरेदी केलेल्या दराची रक्कम परत करून जमीन शेतकऱ्यांची होईल, असे करारनाम्यात स्पष्ट नमुद होते. मागील २१ वर्षांपासून या जमिनीचा कंपनीने कुठलाही वापर केला नाही व १९९५ पासून शेतकरी आजतागायत शेती करीत आहे. असे असताना कंपनीने मध्यंतरीच्या काळात ६ शेतकऱ्यांना खरेदी किंमत घेऊन जमीन परत केली. परंतु उर्वरीत जमिन ही कंपनीच्या नावे असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने व खरेदी विक्री करण्यास झाला नाही. केंद्रीय राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी या प्रश्नावर मागील बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा केला व आघाडी सरकारच्या कारकीर्दीत हा प्रश्न सातत्याने लावून धरला. परंतु मागील सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. मात्र ना. हंसराज अहीर यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी २०१४-१५ मध्ये पत्रव्यवहार करून व १६ जून २०१५ रोजी उद्योगमंत्र्यांसोबत बैठक लावून या समस्येचा निकाल लावला. जमिन संपादनमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जमिनी परत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करावी, असा आदेश २३ जुलै रोजी शासनाने निर्गमीत केला आहे. मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव उपविभागीय अधिकारी राजुरा व अंतिमरित्या तहसिलदार कोरपना यांनी १३ जुलै रोजी जमिनीची विक्री करून शेतकऱ्यांना परत केली. ही जमिन शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात केंद्रीय मंत्र्यांना यश आल्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. शेतकऱ्यांनी जमिनीचे सातबारा तातडीने तहसिल कार्यालयातून आपल्या नावे करावे, असे आवाहन भाजप तर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)