शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

रोजगार सेवकाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

By admin | Updated: May 28, 2015 00:01 IST

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची गावकऱ्यांची ...

चौकशी कासवगतीने : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीनवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची गावकऱ्यांची ओरड असताना चौकशी मात्र कासवगतीने होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नवरगाव येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत २०१३ ते २०१५ या कालावधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना केली होती. रोजगार हमीच्या कामामध्ये एकाच जॉबकार्डवर त्या कुटुंबातील व्यक्तीव्यतिरिक्त इतर नागरिकांचे नाव टाकून हजेरी लावून बिल उचलले तर एकाच व्यक्तीचे कामाचे पैसे अलग अलग बँक अकाऊंटमधून परस्पर उचलले, एक व्यक्ती २०१३ मध्ये ६९ दिवस, २०१४ मध्ये २२५ दिवस, तर २०१५ मध्ये २० दिवस कामावर दाखविण्यात आली. परंतु प्रत्येक मजुराला १०० दिवस काम असताना २०१४ मध्ये एकाच व्यक्तीला २२५ दिवस कामावर लावल्याची चर्चा आहे. एकाच मजुराची एकाच दिवशी दोन ठिकाणच्या कामावर नोंद घेतल्या गेली तर काही व्यक्तीला दोन बायका- मुलं दाखवून त्यांच्याही नावे मजुरी उचलली असल्याचा आरोप आहे. एक ग्रामपंचायत सदस्य कामावर गेला नाही. मात्र त्याच्याही नावाने पैसे उचलले आहेत. काही मजूर अस्तित्वातच नाही. अशाही व्यक्तीची हजेरी लावून पैशाची उचल केली. माळी मोहल्ला ते बांध तलाव पांदण रस्त्यावर बोल्डर न टाकताच पैशाची उचल केली. प्रकाश खोब्रागडे ते वामन बोडणे पांदण रस्त्यावर मुरुम न टाकताच पैशाची उचल केली, असे विविध आरोप तक्रारकर्त्यांनी रोजगार सेवकावर लावलेले आहेत.तसेच नवरगाव येथे १३० शोषखड्डे खोदण्याचे दाखवून एका शोषखड्ड्याच्या मागे १८०० रुपयेप्रमाणे पैशाची उचल केली असून प्रत्यक्षात मात्र ३० ते ३५ शोषखड्डेही आता उपलब्ध नाहीत. काही बुजलेले तर काही खड्डेच खोदले नसल्याचा आरोपही तक्रारकर्त्यांनी केला आहे.मात्र या संपूर्ण प्रकरणात केवळ रोजगार सेवकावरच भ्रष्टाचाराच्या आरोपाचा ठपका तक्रारीत असून इतर अधिकाऱ्यांवर आरोप नाही. २२ मे रोजी चौकशी करण्यासाठी तालुकास्तरावरुन समिती आली. काही नागरिकांचे बयाण घेतले व तक्रारकर्त्यांचे बयाण घेतले. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी ठप्प आहे. यापूर्वीही २० फेब्रुवारी २०१४ ला येथील ग्रा.पं. सदस्य आनंदराव टिपले यांनी नर्सरीमधील रोपाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा आरोप करुन वरिष्ठ स्तरावर तक्रार केली होती. ग्रा.पं. नवरगाव येथील मग्रारोह १०० कोटी वृक्ष लागवडी योजनेंतर्गत २१ हजार १०० रोपांची नर्सरी तयार करण्यात आली. त्यापैकी १ हजार ३२० रोपांची लागवड केली. विविध संस्थांना ३ हजार ८५० रोपे वाटप केली तर शेतकऱ्यांना १३ हजार ९३० रोपे वाटप केली. म्हणजेच १९ हजार १०० लागवड वाटप केली व शिल्लक रोपे २ हजार दाखविण्यासाठी जाळल्याचा आरोप तक्रारीत केला होता. या प्रकरणाची चौकशी झाली.रोजगार सेवकाने १० ते १२ हजार रोपे जाळल्याचा आरोप ठेवून कार्यवाहीस पात्र असल्याचा ठपका ठेवला तर ग्रामविकास अधिकारी बी.सी. शंभरकर यांनीसुद्धा नर्सरीमधील रोपांची नोंद साठा रजिस्टरवर घेतली नसल्याने कर्तव्यात कसूर केली. तेसुद्धा जि.प. सेवा शिस्त १९६४ चे नियम ४ नुसार कारवाईस पात्र असल्याचा ठपका ठेवण्यात आला. आता पुन्हा भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या आहेत. (वार्ताहर)