शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

निरस्त प्रकरणातील आरोपींना परत नव्याने समन्स

By admin | Updated: September 25, 2015 01:39 IST

प्रकरण निरस्त झाले असतानाही परत त्याच प्रकरणासंदर्भात येथील काही नागरिकांना समन्स बजावण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.

नागभीड : प्रकरण निरस्त झाले असतानाही परत त्याच प्रकरणासंदर्भात येथील काही नागरिकांना समन्स बजावण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस विभागाच्या या धोरणाबद्दल संतापही व्यक्त होत आहे.२००९ देशात लोकसभेची निवडणूक झाली. चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात त्यावेळी भाजपकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून मारोतराव कोवासे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत आचारसंहितेचे भंग केल्याच्या आरोपावरुन त्यावेळी येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय गजपुरे, जहाँगीर कुरेशी, रवींद्र आंबोरकर, वामण तलमले यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.काही दिवस हे प्रकरण कोर्टात चालल्यानंतर यथावकाश या प्रकरणाचा निकाल लागला. या सर्वांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. दरम्यान २०१५ मध्ये या तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि अचानकपणे २००९ च्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या सर्व लोकांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले.हे समन्स हाती पडल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रकरण निरस्त झाल्यानंतर समन्स कसे काय, यासंदर्भात त्यांनी माहिती काढली असता गेल्या १० वर्षात ज्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांनाच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशान्वये समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळाली. (तालुका प्रतिनिधी)