शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

निरस्त प्रकरणातील आरोपींना परत नव्याने समन्स

By admin | Updated: September 25, 2015 01:39 IST

प्रकरण निरस्त झाले असतानाही परत त्याच प्रकरणासंदर्भात येथील काही नागरिकांना समन्स बजावण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.

नागभीड : प्रकरण निरस्त झाले असतानाही परत त्याच प्रकरणासंदर्भात येथील काही नागरिकांना समन्स बजावण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस विभागाच्या या धोरणाबद्दल संतापही व्यक्त होत आहे.२००९ देशात लोकसभेची निवडणूक झाली. चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात त्यावेळी भाजपकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून मारोतराव कोवासे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत आचारसंहितेचे भंग केल्याच्या आरोपावरुन त्यावेळी येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय गजपुरे, जहाँगीर कुरेशी, रवींद्र आंबोरकर, वामण तलमले यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.काही दिवस हे प्रकरण कोर्टात चालल्यानंतर यथावकाश या प्रकरणाचा निकाल लागला. या सर्वांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. दरम्यान २०१५ मध्ये या तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि अचानकपणे २००९ च्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या सर्व लोकांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले.हे समन्स हाती पडल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रकरण निरस्त झाल्यानंतर समन्स कसे काय, यासंदर्भात त्यांनी माहिती काढली असता गेल्या १० वर्षात ज्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांनाच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशान्वये समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळाली. (तालुका प्रतिनिधी)