शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

२५ गावातील खातेदारांना बँकेसाठी मारावा लागतो ६० किमीचा फेरफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील व देवाडा परिसरातील बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी पेसामध्ये येतात. देवाडा येथे विदर्भ कोकण ...

देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील व देवाडा परिसरातील बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी पेसामध्ये येतात. देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. व्यवहार सुरळीत सुरू असताना २०१० मध्ये बँक शाखा बंद करण्यात आली. ती सुरू करावी, अशी मागणी आहे. नागरिकांना व्यवहार करण्यासाठी ३० किलोमीटरवर अंतरावरील राजुरा येथे जावे-यावे लागते. असा ६० किमीचा फेरफटका मारावा लागत आहे.

आदिवासी दुर्गम भागात देवाडा हे मोठे गाव आहे. सुमारे २५ गावे देवाडा गावाच्या संपर्कात आहेत. रविवारी या ठिकाणी मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार व्यवस्थित सुरू आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँक नसल्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जावे लागते. महिला बचत गटांना दरमहा रक्कम उचल करणे, भरणे व कर्ज घेण्यासाठी राजुरा येथे जाणे अडचणीचे ठरत आहे. शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, कर्ज घेणे, बँकेत खाते उघडणे, निराधार श्रावण बाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी योजनांचा लाभ घेणे, अपंग व वयोवृद्ध नागरिकांना बँकेतून रक्कम घेण्याकरिता वेळ व आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन झाल्यामुळे जनधन योजना शेतकरी सन्मान योजना, शौचालयाचे बांधकाम वा तेंदुपत्ता रक्कम अशा कोणत्याही योजनेसाठी नागरिकांना आपले बचत खाते लिंक करावे लागते. यासाठी शेतीची कामे सोडून राजुराकडे धाव घ्यावी लागते. देवाडा सर्कलमध्ये ७० टक्के शेतकरी आहेत. त्यांचे जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र बँकेच्या कामासाठी गेल्यास त्यांच्या एक दिवस व्यर्थ जातो. एका फेरीत काम झाले तर ठिक अन्यथा परत दुसऱ्या दिवशी पुन्हा राजुऱ्याला जावे लागते. प्रत्येक हंगामात असाच प्रकार घडतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येतात. योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.