शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

महिनाभरापासून माळरानावर राहत असलेल्या गावकऱ्यांपैकी एका महिलेचा आकस्मिक मृत्यू; महाराष्ट्र तेलंगणच्या सीमेवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:25 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या व तेलंगण व आंध्रातील आरक्षण वादापोटी संभावित हल्ल्याच्या भयाने आता उघड्या माळरानावर रहात असलेल्या प्रेमनगरातील एका महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देसीमावादात अडकले प्रेमनगरहल्ल्याच्या भयापोटी अख्खे गाव राहत आहे उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या व तेलंगण व आंध्रातील आरक्षण वादापोटी संभावित हल्ल्याच्या भयाने आता उघड्या माळरानावर रहात असलेल्या प्रेमनगरातील एका महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यापासून २७ कि.मी. अंतरावर प्रेमनगर हे गाव १० वर्षांपूर्वी वसले. तेथे उदरनिर्वाहासाठी आलेल्या नागरिकांकरिता महाराष्ट्र सरकारने पिण्याच्या पाण्याची, विजेची व रस्त्याची व्यवस्थाही करून दिली. मात्र तेलंगणा व आंध्रप्रदेशातील आरक्षणाच्या वादामुळे बंजारा व आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला. प्रेमनगरची नोंद महाराष्ट्रासोबत तेलंगणातही करण्यात आली असल्याने आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार या नाराजीपोटी तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरवर हल्ला चढविला होता. गाव उठवा नाहीतर घरे जाळू अशी आक्रमक व हिंसक भूमिका तेलंगणवासियांनी घेतल्यामुळे प्रेमनगरातील नागरिकांनी ते गाव सोडून माळरानावर बस्तान मांडले होते. तेलंगणच्या नागरिकांनी या गावावर आक्रमण करून विवाहाचा मंडपही पेटवून दिल्याची घटना घडली होती. यावेळी अख्खअया गावाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.तेलंगणचे नागरिक पुन्हा हल्ला करतील या भयाने गावकऱ्यांनी गाव सोडून आपल्या गोठ्यात, शेतात वा नातेवाईकांकडे राहणे सुरू केले. थंडीचा कडाका सहन करीत लहान मुले, स्त्रिया व वृद्ध नागरिक उघड्या माळरानावर राहत आहेत. शनिवारी पहाटे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव गुणाबाई उत्तम जाधव असे असून तीही आपल्या शेतात राहत असल्याचे समजते.

 

टॅग्स :Governmentसरकार