शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बीआयटी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:12 IST

बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. सदर कर्मचाºयाचे मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने तो मानसिक तणावात होता.

ठळक मुद्देआर्थिक मदतीसाठी मृतदेह घेऊन महाविद्यालयात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. सदर कर्मचाºयाचे मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने तो मानसिक तणावात होता. अशातच त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत व पत्नीला नोकरी देण्याच्या मागणीसाठी बीआयटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी मृतदेह महाविद्यालयात नेऊन आंदोलन केले.अमर महादेव नगराळे (३२) असे मृतकाचे नाव आहे. तो तालुक्यातील मानोरा येथील रहिवासी असून होमगार्ड म्हणूनही तो कार्यरत होता. अमर नगराळे हा मंगळवारी रात्री १० वाजता आपल्या एमएच ३४ एक्स ८१७० या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने येथून मानोराकडे जात होता. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. मृतक अमर हा बामणी येथील बिआयटीचा कर्मचारी होता.बीआयटी कर्मचाºयांचे मागील आठ महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. थकित पगाराच्या मागणीकरिता अमर नगराळे हा उपोषणालाही बसला होता. वेतन मिळत नसल्याने अमर मागील अनेक महिन्यांपासून मानसिक तणावात होता. अशातच त्याचा असा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी बिआयटी येथील कर्मचाऱ्यांनी अमरचा मृतदेह थेट महाविद्यालयात नेला. आर्थिक मदत व पत्नीला नोकरी देण्याची मागणी रेटून धरली. दरम्यान महाविद्यालय व्यवस्थापनाने मृतकाच्या पत्नीला नोकरीवर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत अंत्यसंस्कार करण्यात आले.बीआयटीमधील कर्मचाऱ्यांचे मागील काही महिन्यांचे वेतन थकित आहे. वेतन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. अमर नगराळे यांचा अपघाती मृत्यू झाला. ते संस्थेत नऊ वर्षांपासून होते. त्यांच्या पत्नीला नोकरीत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.- संजय वासाडे, कार्याध्यक्ष, कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, बल्लारपूर