शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

शेतकरी विमा अपघात योजनेलाच ‘अपघात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST

चंद्रपूर : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी पाठविलेल्या १०१ प्रस्तावांपैकी केवळ ...

चंद्रपूर : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी पाठविलेल्या १०१ प्रस्तावांपैकी केवळ ४२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. १८ प्रस्तावात त्रुटी असून ३६ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आहेत. तर ५ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थोर्य प्राप्त करुन देणाऱ्या या योजनेचाच अपघात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतात काम करीत असताना होणारे अपघात, संपदर्श, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारा मृत्यू, रस्ता अपघात, वाहन अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत देण्याच्या अनुषंगाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेतंर्गत सन २०१९-२०२० या वर्षात १०१ शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव सादर केले. यापैकी केवळ ४२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पाच प्रस्ताव अपात्र ठरले. ३६ प्रस्ताव कंपनीकडे आहेत. तर १८ प्रस्तावात विविध त्रुटी आहेत. प्रस्ताव मंजुरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने या योजनेचाही शेतकऱ्यांना पाहीजे त्या प्रमाणात लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

बॉक्स

कोणाला किती मिळते मदत

शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन लाख रुपये, एक हात व एक पाय असे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत मिळत असते.

बॉक्स

सर्वाधिक प्रकरणे रोड अपघाताची

जिल्ह्यात दाखल झालेल्या १०१ प्रस्तावापैकी सर्वाधिक प्रकरणे रोड अपघाताची आहेत. प्रस्ताव सादर करीत असताना अनेक कागदपत्राची पूर्तता करावी लागते. त्यामुळे अनेक प्रस्तावात त्रुटी येतात. शेतकरी कुटुंबाशी विमा कंपनीद्वारे पत्रव्यवहार केला जातो. या योजनेसाठी १० डिसेंबरपर्यंतचा कालावधी गृहीत धरण्यात येतो. विमा संरक्षणापोटी राज्य शासनाच्या वतीने विमा कंपनीत शेतकऱ्यांचा विमा भरला जातो.

बॉक्स

२०२० साली मंजूर व प्रलंबित प्रकरणे

रस्ता अपघात २६

वन्यप्राणी अपघात १०

वीज पडून २

पाण्यात बुडून २१

उंचावरुन पडून २

विद्युत शॉक ९

विष प्राशन १

कोट

सध्यास्थितीत ४२ प्रस्ताव मंजूर झाले असून विविध कारणास्तव ५४ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणाबाबत पाठपुरावा सुरु आहे. दर आठवड्याला यासंदर्भात आढावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना त्रुटी पूर्तता करण्याच्या सुचना करण्यात येतात.

- उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर