शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विमा अपघात योजनेलाच ‘अपघात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST

चंद्रपूर : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी पाठविलेल्या १०१ प्रस्तावांपैकी केवळ ...

चंद्रपूर : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी पाठविलेल्या १०१ प्रस्तावांपैकी केवळ ४२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. १८ प्रस्तावात त्रुटी असून ३६ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आहेत. तर ५ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थोर्य प्राप्त करुन देणाऱ्या या योजनेचाच अपघात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतात काम करीत असताना होणारे अपघात, संपदर्श, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारा मृत्यू, रस्ता अपघात, वाहन अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत देण्याच्या अनुषंगाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेतंर्गत सन २०१९-२०२० या वर्षात १०१ शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव सादर केले. यापैकी केवळ ४२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पाच प्रस्ताव अपात्र ठरले. ३६ प्रस्ताव कंपनीकडे आहेत. तर १८ प्रस्तावात विविध त्रुटी आहेत. प्रस्ताव मंजुरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने या योजनेचाही शेतकऱ्यांना पाहीजे त्या प्रमाणात लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

बॉक्स

कोणाला किती मिळते मदत

शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन लाख रुपये, एक हात व एक पाय असे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत मिळत असते.

बॉक्स

सर्वाधिक प्रकरणे रोड अपघाताची

जिल्ह्यात दाखल झालेल्या १०१ प्रस्तावापैकी सर्वाधिक प्रकरणे रोड अपघाताची आहेत. प्रस्ताव सादर करीत असताना अनेक कागदपत्राची पूर्तता करावी लागते. त्यामुळे अनेक प्रस्तावात त्रुटी येतात. शेतकरी कुटुंबाशी विमा कंपनीद्वारे पत्रव्यवहार केला जातो. या योजनेसाठी १० डिसेंबरपर्यंतचा कालावधी गृहीत धरण्यात येतो. विमा संरक्षणापोटी राज्य शासनाच्या वतीने विमा कंपनीत शेतकऱ्यांचा विमा भरला जातो.

बॉक्स

२०२० साली मंजूर व प्रलंबित प्रकरणे

रस्ता अपघात २६

वन्यप्राणी अपघात १०

वीज पडून २

पाण्यात बुडून २१

उंचावरुन पडून २

विद्युत शॉक ९

विष प्राशन १

कोट

सध्यास्थितीत ४२ प्रस्ताव मंजूर झाले असून विविध कारणास्तव ५४ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणाबाबत पाठपुरावा सुरु आहे. दर आठवड्याला यासंदर्भात आढावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना त्रुटी पूर्तता करण्याच्या सुचना करण्यात येतात.

- उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर