शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जिल्ह्यात आंतर मशागतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

आद्रा नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहते झाले आहेत. खरीपाच्या पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाचीही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे शेत शिवारात शेतकरी आंतर मशागतीच्या कामात व्यक्त आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शेतशिवार फुलले : दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रापाठोपाठ आद्रानेही वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे पीक लागवडीसह बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्या पिकातील आंतर मशागतींना वेग आला असून शेतकऱ्यांसह मजुरांच्या लगबगीने शेतशिवार फुलले आहेत.आद्रा नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहते झाले आहेत. खरीपाच्या पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाचीही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे शेत शिवारात शेतकरी आंतर मशागतीच्या कामात व्यक्त आहे. विशेष म्हणजे, धान उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आता डवरनी, निंदनाना सुरुवात केली आहे. तर धान उत्पादक असलेल्या सावली, ब्रह्मपुरी, मूल, सिंदेवाही या तालुक्यातील शेतकºयांनी रोवणीसाठी पऱ्हे टाकणे सुरु केले आहे. काहीजण बैलजोडीच्या साहाय्याने पारंपरिक अवजारांसोबतच तर काही ट्रॅक्टरद्वारे मशीगतीची कामे करीत आहे. शाळांना सुटी असल्यामुळे विद्यार्थीही आई-वडीलांना शेतातील मशागतीच्या कामाला हातभार लावत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन, उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.मजुरी वाढल्याने शेतकरी त्रस्तलॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक आडचणीत असतानाच मजुरीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. शेतीची अंतर्गत मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र यासाठी शेतकºयांना प्रत्येक मजुराला जास्तीची मजुरी द्यावी लागत आहे. यामुळे शेती करणे परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शेतीमालाला हमी भाव नसल्याने शेती आर्थिक नुकसान होत आहे. मात्र हाताला काम नसल्यामुळे कसेतरी पोेट भरायचे म्हणून शेती करायची, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :agricultureशेती