शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

इरई नदीकाठ सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा

By admin | Updated: September 29, 2016 00:52 IST

परिपूर्ण आणि अचूक नियोजन, कामाचा उत्तम दर्जा आणि कामाची गती या त्रिसुत्रीवर इरई नदीकाठ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करून...

सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश : मुंबईत पर्यटन मंत्र्यांसोबत बैठकचंद्रपूर : परिपूर्ण आणि अचूक नियोजन, कामाचा उत्तम दर्जा आणि कामाची गती या त्रिसुत्रीवर इरई नदीकाठ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करून हे सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा, असे आदेश राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, आमदार प्रशांत बंब, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सामाजिक वनीकरण संचालनालयामार्फत नदीकाठी २२ हजार झाडे लावण्यात यावीत. इरई नदी सौंदर्यीकरणाच्या कामास निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, नदीकाठचे सौंदर्यीकरण करताना अशा स्वरूपाचे जगभरात झालेले उत्तम काम अभ्यासण्यात यावे व उत्तमातील उत्तम नियोजन करून नदी विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा, या कामास गती द्यावी, नदीकाठचे सौंदर्यीकरण करताना नदीपात्र विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही वित्तमंत्र्यांनी दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)इरईवर होणार होणार ९ बंधारेइरई नदीवर ९ बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यात दाताळा पूलाचे बांधकाम लवकर करण्यात यावे, यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय मान्यता १५ दिवसात घेण्यात याव्यात, असे निर्देशही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.