शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:43 IST

तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका जनतेसह मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. चारा आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पहाडावर असणाऱ्या गावांतील शेकडो जनावरे वनवन भटंकती करत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : जनावरांसाठी चारा छावण्यांची गरज

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका जनतेसह मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. चारा आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पहाडावर असणाऱ्या गावांतील शेकडो जनावरे वनवन भटंकती करत आहेत.सध्या तालुक्यात मुक्या जनावरांसाठी चारा व पाण्याची आवश्यकता आहे. गाय, बैल, म्हैस, शेळ्या, बकऱ्यांना चारा मिळत नसल्याने भटकावे लागत आहे. चरायला जंगल किंवा गावाबाहेर गेल्यानंतर पाणी मिळत नाही, एवढी भयावह स्थिती मुक्या जनावरांवर आली आहे. पहाडावर जंगलाचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यातच यंदा दुष्काळ पडला. उन्हामुळे झाडेझुडपे वाळली. दिवसभर जंगलात फिरून जनावरे उपाशीपोटी घरी परत येत आहेत. त्यामुळे शेतकरी हबलत झाले. माणूस कुठेही जाऊन पोट भरू शकतो पण जनावरांचे काय, हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाने या परिसराची पाहणी करून वास्तस्थिती जाणून घ्यावी आणि तातडीने चारा छावण्या उभारण्याची मागणी शेतकरी करत आहेत.बेभाव विक्रीजिवती तालुका हा पहाडावर आहे. नेहमीच दुष्काळाच्या झळा बसतात. यावर्षी पिके वाया गेली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. उन्हाळ्याला आता सुरुवात झाली. जनावरांची उपासमारी टाळण्यासाठी बेभाव किमतीत विकण्याची तयारी शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे.भूकबळीचा धोकाचारा आणि पाण्याचा प्रश्न असाच राहिला तर जनांवराचा भूकबळी जाऊ शकतो, अशी परिस्थिती पहाडावर निर्माण झाली आहे. आपल्या मुलांची उपासमारी होऊ नये, यासाठी आई-वडिल चिंतेत असतात. अन्नाची जुळवाजुळव करतात. मुकी जनावरेही आमची लेकरे आहेत. पण पाणी व चारा मिळत नसल्याने जनावरांना जगवायचे कसे, या प्रश्नाने शेतकरी हैराण झाले आहेत.