शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

‘एबीपीएएस’ स्थायी समितीपुढे आलेच नाही

By admin | Updated: May 29, 2016 00:56 IST

महानगर पालिका क्षेत्रातील बांधकामांना मंजुरी देण्यासाठी आणि ही प्रकरणे तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी

आयुक्तांकडून राजकारण : लहामगे यांचा आरोपचंद्रपूर : महानगर पालिका क्षेत्रातील बांधकामांना मंजुरी देण्यासाठी आणि ही प्रकरणे तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अंमलात येणाऱ्या ‘आॅटोमेटेड बिल्डिंग प्लॅन अप्रूवल सिस्टम’ (एबीपीएएस) ला मंजुरी देण्यासाठी नगरसेवकांकडून ४२ लाख रूपयांची मागणी करण्याच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. हे प्रकरण स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आलेच नसताना आयुक्त कोणत्या आधारावर तसे वक्तव्य करीत आहेत, असा प्रतिप्रश्न स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी उपस्थित केला आहे.एबीपीएसचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी काही नगरसेवकांनी ४२ लाख रूपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात आपले मत दर्शविताना स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे मनपाच्या आयुक्तांनी म्हटले होते. मात्र स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी हे प्रकरण स्थायी समितीपुढे प्रलंबित असल्याचे आयुक्तांचे वक्तव्य फेटाळून लावले आहे. एवढेच नाही तर स्थायी समिती आणि त्यात सदस्य असलेल्या १६ नगरसेवकांना आयुक्तांकडून राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या बदनाम केले जात आहे, असा आरोप लहामगे यांनी एका पत्रकातून केला आहे. मनपा आयुक्त सुधीर शंभरकर आणि स्थायी समिती असा नवा वाद आता एबीपीएएसच्या मंजुरी प्रकरणावरून उद्भवू पहात आहे. आयुक्तांसारख्या महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी खोटी माहिती माध्यमांना देणे ही बाब अशोभनिय असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. एडीसीसी इंफोकॅड प्रा.लि.च्या प्रकरणावर स्थायी समितीमध्ये निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी स्वाक्षरी केलेली फाईल २६ मे रोजी सायंकाळी स्थायी समितीकडे पाठविण्यात आली. ३१ मे रोजी स्थायी समितीची सभा होणार आहे. असे असतानाही स्थायी समितीकडे प्रकरण प्रलंबित असल्याची सांगण्यामागे आयुक्तांची नेमकी काय मानसिकता आहे, हे समजणे कठीण आहे. प्रत्यक्षात एबीपीएएस ही प्रणाली १ एप्रिल २०१५ पासूनच लागू व्हायला हवी होती. मात्र आयुक्तांच्या चालढकल भूमिकेमुळेच या मंजुरीसाठी जवळपास वर्ष लोटल्याचा आरोप लहामगे यांनी केला आहे. स्थायी समितीपुढे यापूर्वीच यायला हवे असणारे हे प्रकरण निव्वळ त्यांच्या भूमिकेमुळेच २६ मे रोजी पोहोचले आहे. यात स्वत: दोषी असतानाही स्थायी समितीच्या सदस्यांनाच या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न ते करीत असून या प्रकरणाआडून ते मनपात राजकारण करेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)