शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ५४ कोटी अखर्चित

By admin | Updated: April 11, 2015 00:53 IST

शासनाकडून निधी मिळत नसल्याच्या थापा मारत विकास कामांना ब्रेक देणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बिंग फुटले आहे.

विकास कामे ठप्प : निधी नसल्याची बोंब ; प्रत्यक्षात मात्र कामेच नाहीचंद्रपूर : शासनाकडून निधी मिळत नसल्याच्या थापा मारत विकास कामांना ब्रेक देणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बिंग फुटले आहे. २०१४-१५ या वित्तीय वर्षात तब्बल ५३ कोटी ९७ लाख ४७ हजार रूपयाचा निधी अर्खीत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या वित्त समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी बांधकामावर किती निधी खर्च झाला, याची माहिती विचारली असता, ही माहिती समोर आली आहे. अच्छे दिनचे दिवास्वप्न दाखवत भाजप पदाधिकारी सत्तेच्या बोहल्यावर चढल्यानंतर प्रत्यक्षात मात्र चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी अखर्चीत ठेवल्याने जिल्हा परिषदेला बुरे दिन आले आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाचे विनोद अहिरकर व सतिश वारजूकर या जि.प. सदस्यांनी पत्रकाद्वारे केला आहे. ६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सुरु असताना २०१४-१५ या वित्तीय वर्षात बांधकामावरील किती निधी अखर्चीत आहे, याची माहिती विनोद अहीरकर यांनी सभागृहाला मागितली. त्यानंतर देण्यात आलेल्या माहितीत अखर्चीत निधीचा आकडा पाहता संपूर्ण सभागृह संतप्त झाले. बांधकामासाठी निधी नाही, अशी सतत ओरड होत असताना प्रत्यक्षात मात्र आलेला निधी वेळीच वापरता आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक विकास कामे झालेली नाही, असा आरोप विनोद अहिरकर व सतिश वारजूकर यांनी केला आहे.राज्याचे अर्थ व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वस्त असलेले देवराव भोंगळे हे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आहेत. मात्र त्यांनी प्रत्यक्षात कोट्यवधी रूपयांचा निधी अखर्चीत ठेऊन आपली अकार्यक्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांना उत्तर देताना भोंगळे यांची पंचाईत होत आहे. ५४ कोटींचा निधी अखर्चीत असताना देवराव भोंगळे यांनी मात्र परिक्षेत्रात कामे मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना निधी नाही, शासनाकडे पत्रव्यवहार सुरु आहे. निधी मिळाला की कामे देऊ अशा थापा मारल्या. मात्र आलेल्या निधीचे साधे नियोजन सुद्धा त्यांना करता आले नाही. त्यामुळे ५४ कोटींचा निधी अखर्चीत राहिला, असे जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर व सतिश वारजूकर यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्याचे वित्त मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याकरिता जादा निधीची तरतुद करीत आहेत. मात्र त्याचाच पक्षाचे जबाबदार सभापती निधी अखर्चीत ठेवत असल्याने जिल्ह्यात विकास कामांना खिळ बसल्याचे अहीरकर व वारजूकर यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाव्यतीरिक्त इतरही विभागात निधी अखर्चीत आहे. त्यामुळे विकास काम होऊ शकलेले नाही. यासंदर्भात बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)देवराव भोंगळे यांनी राजीनामा द्यावानिधी नाही अशा थापा मारत शासनाकडून मिळालेला ५४ कोटींचा निधी अखर्चीत ठेवणारे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर व विनोद अहिरकर यांनी केली आहे. सुरुवातीच्या काळात देवराव भोंगळे यांचा आव पाहता जिल्हा परिषदेच्या विकासात ते महत्त्वाची भूमिका बजावतील असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यांच्यासारखा खराब कार्यकाळ यापूर्वीच्या कोणत्याच बांधकाम सभापतीचा राहिला नाही, असा आरोपही विनोद अहीरकर व सतिश वारजूकर यांनी केला आहे.