शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

चाकाेरीबाहेरचा सेवाभाव; प्रोटीन डाएटसाठी ‘त्या’ २५ रुग्णांना महिलांनी घेतले दत्तक

By राजेश मडावी | Updated: January 11, 2024 17:55 IST

कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; मनपा आयुक्तांकडून प्रशंसा.

राजेश मडावी, चंद्रपूर : शहरात मध्यमवर्गीय व सुखवस्तू कुटुंबांची संख्या बरीच आहे. त्यातील काहीजण प्रसिद्धीच्या आवरणात वावरू इच्छितात. मात्र, गांधीवादी सेवाभावी कार्यकर्ते गाडे गुरूजींच्या प्रेरणेतून सुरू केलेल्या महिला संस्कार कलश योजनेशी जुळलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांनी २५ क्षयरुग्णांना प्रोटीन डाएट मिळावे, यासाठी त्यांना दत्तक घेण्याचे धाडस दाखविले. यानंतर मदतीची पहिली किट जिल्हा टी. बी. हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. ६) वितरित करण्यात आली.

यावेळी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. ललित पटले, अमोल जगताप, महिला संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष उषा बुक्कावार, प्रकल्प निर्देशिका अंजली बिरेवार, माधुरी नार्लावर, कलशच्या पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते. आयुक्त पालिवाल यांनी महिला कलशसारख्या सेवाभावी संस्थांची आरोग्य क्षेत्राला गरज असल्याचे सांगितले. डाॅ. मुंधडा यांनीही आरोग्य उपक्रमाचे कौतुक केले.

 क्षयरोगमुक्त भारताची संकल्पना समोर ठेवून ‘प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान’ जिल्ह्यात सुरू आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. पटले यांनी दिली. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्थांनी निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. महिला संस्कार कलश योजनेच्या भगिनींनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील २५ रुग्णांना प्रोटीन डाएट देण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. अंजली बिरेवार यांनी सूत्रसंचालन केले.

उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या मैत्रिणींचा सत्कार :

क्षयरुग्णांना तांदूळ, तूरडाळ, तेल, शेंगदाणा, चिक्की, फुटाणे, सोयाचिक्स व खजूर देण्यात आला. शिवाय, गीता पाऊणकर यांनी संस्कार कलशला पाच हजारांची मदत दिली होती. त्यातून रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. एक लाखाच्या निधीतून क्षयग्रस्त रुग्णांना प्रोटीन डाएट देण्यात येणार आहे. या उपक्रमाला आर्थिक सहकार्य करणाऱ्या मैत्रिणींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘लोकमत’ने दिली प्रेरणा :

‘लोकमत’ने ६ डिसेंबर २०२३ रोजी ‘टीबीवर उपचार मिळतोय; पण पोषण आहाराचे काय’ या मथळ्याखाली लक्षवेधी वृत्त प्रकाशित केले होते. जिल्ह्यातील २५८८ रुग्णांपैकी केवळ ५८१ टीबी रुग्णांना दात्यांकडून पोषण किट मिळत असल्याचे वृत्तात म्हटले होते. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काही रुग्णांची जबाबदारी घ्यावी, हा विचार मनात आला. मैत्रिणींना सांगितल्यानंतर त्यांना उपक्रमाचे महत्त्व कळले. अन्य संघटनांनीही टीबी रुग्णांना अशी मदत करावी, असे आवाहन महिला संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष उषा बुक्कावार यांनी केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरMuncipal Corporationनगर पालिका