शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

आधार यंत्रणा झाली निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:33 IST

शासकीय कामकाजासाठी व योजनांसाठी सक्तीचे करण्यात आलेले आधार कार्ड कोरपना तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

तालुक्यातील आठही केंद्र बंद : नागरिक आधाराच्या प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : शासकीय कामकाजासाठी व योजनांसाठी सक्तीचे करण्यात आलेले आधार कार्ड कोरपना तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नोंदणी होऊनही आधार कार्ड बनले नसून नवीन नोंदणी किंवा सुधारणा करणेही बंद आहे. तालुक्यात आठ आधार केंद्र असूनसुद्धा दैनंदिन व्यवहाराकरिता पर्वणी ठरणारे आधार कार्ड आता मात्र निराधार झाल्याचे दिसून येत आहेत. आधार कार्डबाबत जिल्हा प्रसाशनाने प्रारंभी सकारात्मक पावले उचलली होती. मात्र आता ते अशा प्रकारापासून अनभिज्ञ आहे. तालुक्यात तीन शहरे व ११० गावे यांची अंदाजे लोकसंख्या एक लाख २१ हजार ४७९ आहे. यातील कित्येक लोकांकडे अजूनही आधार कार्ड नाहीत. गेल्या एक महिन्यापासून आधार कार्ड का बनत नाही, याचे उत्तर जिल्हा प्रशासन आणि यू.आय.डी विभागाकडे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सर्व स्तरावर जनतेला जगण्याचा परवाना ठरलेल्या आधार कार्ड तयार करणारी यंत्रणा मागील एक महिन्यांपासून कोमात गेल्याने तालुक्यातील हजारो नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आधार कार्ड नाही, शिवाय आॅनलाईन यंत्रणाही कुचकामी ठरत असल्याने विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना आता व्यवहार कसा करावा, या चिंतेने ग्रासले आहेत.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली तक्रार यंत्रणा सज्ज केली आहे. हॅलो चांदा नावाची हेल्प लाईन सुरु केली आहे. या यंत्रणेमुळे तरी नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.विद्यार्थ्यांची गैरसोयशाळेत नवीन अडमिशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड असणे सक्तीचे केले आहे. तसेच गणवेशाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे असल्याने तिथेही आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने बँक खाते उघडण्यात अडचणी निर्माण होत आहे.याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांनासुद्धा सहन करावा लागत आहे. तालुक्यात आठ आधार कार्ड केंद्र आहेत. बऱ्याचशा खेडेगावातील नागरिकांनी आजही आधार कार्ड काढलेले नाही. विविध शासकीय योजनांकरिता आधार कार्ड सक्तीचे असल्याने अनेक लाभार्थी लोकांना आज आधार कार्डची आवश्यकता आहे. मात्र आधार सेवा बंद असल्याने त्यांना आधार केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सरकारने आधार आणि पॅन लिंकवर सध्या भर दिला आहे. परंतु कित्येक नागरिकांच्या पॅन कार्डवर नावाच्या आणि जन्म तारखेच्या चुका आहेत. त्या सुरळीत करण्याकरिता आधार कार्ड आवश्यक आहेत. आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे आधार व पॅन लिंकिंगचे कामसुध्दा ठप्प पडले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेशासनाने जवळपास सर्वच व्यवहाराकरिता आधार कार्ड सक्तीचे केले आहे. तालुक्यातील आठ केंद्रामार्फत आधार कार्ड बनविण्याचे काम थांबले असून नागरिकांची इकडून तिकडे भटकंती सुरू आहे. जातीचे दाखले, बँकेचे केव्हायसी फार्म, राशन कार्ड, गॅस कनेक्शन याशिवाय इतर विविध शासकीय योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक झाले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांंनी स्वत: याकडे लक्ष देऊन नागरिकांना आधार द्यावा, अशी मागणी आहे.