शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

९६० सहकारी संस्थांचा कारभार गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

चंद्रपूर : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी सहकार कायद्याला धाब्यावर बसविल्याने २०१५ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यातील ९६० ...

चंद्रपूर : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी सहकार कायद्याला धाब्यावर बसविल्याने २०१५ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यातील ९६० सहकारी संस्थांना कारभार गुंडाळावा लागला. कोरोना लॉकडाऊन काळातही २१ संस्थांची नोंदणी रद्द झाली. त्यामुळे जिल्ह्यात सहकार चळवळ रूजायला आणखी किती वर्षे लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील सहकारी चळवळीला तसा मोठा इतिहास नाही. केंद्र सरकारने मार्च २०११ मध्ये ९७ वी घटनादुरूस्ती करून राज्यातील सहकार कायद्याला घटनात्मक अधिकार दिला. त्यापूर्वी प्रत्येक राज्यातील सहकार कायदा वेगळा होता. देशपातळीवर हा कायदा एकच असावा, या उद्देशाने केंद्राने ही दुरूस्ती केली. सर्व संस्था राज्य सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे कार्यालयाच्या नियंत्रणाखाली येतात. राज्याने केंद्राच्या आदेशानुसार १३ ऑगस्ट २०१३ पासून नवीन सुधारणा व दुरूस्त्यांसह सहकार कायदा आणला आहे. तेव्हापासून जिल्ह्यात सहकारी संस्थांची संख्या वाढली. परंतु, २०२१ पर्यंत ९६० संस्था अवसायनात निघाल्या. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या सहकार चळवळीतील चुकांचा शोध घेऊन शासनाने सुधारणा केली तरच विश्वासार्हता टिकू शकेल. अन्यथा बुडत्याचा पाय पुन्हा खोलात जाण्याची शक्यता आहे.

१२२ सहकारी संस्था अस्तित्वात

२०१५-२०१६ या वर्षात सहकारी संस्थांची संख्या ८५१ पर्यंत पोहोचली. त्याचवर्षी ६९३ संस्थांवर अवसायनाची कारवाई पूर्ण होऊन नोंदणी रद्द झाली. तेव्हापासून २०१८-१९ चे वर्षे वगळल्यास दरवर्षी सहकारी संस्था कुलुपबंद होत आहेत. सध्या १२२ सहकारी संस्था अस्तित्वात आहेत.

सहकारी संस्था कुणी बुडविल्या?

सहकार कायदा, नियम, संस्थांचा उपविधी, मार्गदर्शनक सूचना व सरकारच्या धोरणात्मक निर्णयाच्या आधीन राहून सर्व सहकारी संस्थांचा कामकाज करणे अपेक्षित आहे. मात्र, काही संस्था राजकीय दावणीला बांधल्या, काही कागदावरच राहिल्या, काही गैरव्यवहाराने पोखरल्या. वारेमाप घोषणा करणाऱ्या सरकारने बेरोजगारांच्या संस्थांना तर अर्थबळच दिले नाही, हेही वास्तव आहे.

नोंदणी करूनही ठावठिकाणा नाही

३१ मार्च २०१५ मध्ये जिल्ह्यात ८५१ संस्थांची नोंदणी झाली. सहकार विभागाच्या सर्वेक्षणानुसार, यातील कार्य स्थगित व ठावठिकाणाच नसणाऱ्या संस्थांची संख्या १२७ आढळली. त्यामध्ये चंद्रपूर ६३ व नागभीड तालुक्यातील २० संस्थांचा समावेश होता. १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये या लॉकडाऊन काळात २१ संस्था बंद झाल्या.

नोंदणी रद्द झालेल्या सहकारी संस्था

२०१५-०१६- ६९३

२०१६-०१७- ४८

२०१७-०१८- ११०

२०१९-२०२०.....

२०२१- २०२१- २१

कोट

९६० संस्थांची नोंदणी रद्द करण्यापूर्वी लेखापरीक्षण व आर्थिक व्यवहाराबाबतची प्रक्रिया नियमानुसार पार पडली. काही संस्थांनी आर्थिक व्यवहार केला नाही तर काहींनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले. या संस्थांवर शासनाची थकबाकी नाही.

-ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूर