यात श्रावण बाळ व वृद्धापकाळ योजनेच्या ५३ तर संजय गांधी योजनेच्या ४१ लाभार्थींचा समावेश आहे. यावेळी समितीचे सदस्य दशरथ वाकूडकर, संजय गेडाम, सुनील शेंडे, सोनल मडावी, सत्यनारायण अमर्दुतीवार, रूपाली संतोषवार, अर्चना चावरे, सदस्य सचिव म्हणून नायब तहसीलदार यशवंत पवार आदी उपस्थित होते.
दरम्यान, संजय गांधी, वृद्धापकाळ, श्रावणबाळ गरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत करणारी योजना असून, अगदी कमी कागदपत्रे लागत असतात; मात्र काही दलाल गरीब लोकांना आर्थिक शोषण करताना दिसत आहेत. यापुढे दलालाची गय केली जाणार नाही व गरजुंना समितीचे सदस्य विशेष लक्ष घालून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी सांगितले.