शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

कर्जमाफी योजनेपासून ९० शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST

तोहोगाव : तोहोगाव येथील ९० शेतकऱ्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत ...

तोहोगाव : तोहोगाव येथील ९० शेतकऱ्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्ग, लाॅकडाऊन, सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, नवीन कर्ज देण्यास बँकांचा नकार, अशा विवंचनेत शेतकरी सापडला असून, जगू की मरू, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शेतीकरिता गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी नियमित कर्ज योजनेचा लाभ घेतला. परंतु सततच्या नापिकीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असल्याने कर्ज थकीत राहात आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत असतानाच तत्कालीन युती शासनाने आणि विद्यमान आघाडी सरकारनेही शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मोठ्या आनंदाने शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा रितसर अर्ज भरला आणि कर्ज माफ होणारच, अशा आशेवर शेतकरी होते.

परंतु शासकीय घोडचूक, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा यामुळे शेकडो शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

याबाबत वंचित शेतकऱ्यांनी संबंधित बँक अधिकारी, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत हाकलून देत आहेत. दरम्यान, लोकलेखा समितीचे प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, सहकारमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

अगोदरच कोरोना संकट, सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि पात्र असतानाही कर्जमाफीपासून वंचित झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने दखल घेऊन तत्काळ न्याय देण्याची मागणी शेतकरी किशोर कासनगोट्टूवार, पांडुरंग भगत, बंडू गौरकार, संदीप मोरे आदींनी केली आहे.