शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजनेपासून ९० शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST

तोहोगाव : तोहोगाव येथील ९० शेतकऱ्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत ...

तोहोगाव : तोहोगाव येथील ९० शेतकऱ्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्ग, लाॅकडाऊन, सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, नवीन कर्ज देण्यास बँकांचा नकार, अशा विवंचनेत शेतकरी सापडला असून, जगू की मरू, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शेतीकरिता गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी नियमित कर्ज योजनेचा लाभ घेतला. परंतु सततच्या नापिकीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असल्याने कर्ज थकीत राहात आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत असतानाच तत्कालीन युती शासनाने आणि विद्यमान आघाडी सरकारनेही शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मोठ्या आनंदाने शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा रितसर अर्ज भरला आणि कर्ज माफ होणारच, अशा आशेवर शेतकरी होते.

परंतु शासकीय घोडचूक, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा यामुळे शेकडो शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

याबाबत वंचित शेतकऱ्यांनी संबंधित बँक अधिकारी, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत हाकलून देत आहेत. दरम्यान, लोकलेखा समितीचे प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, सहकारमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

अगोदरच कोरोना संकट, सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि पात्र असतानाही कर्जमाफीपासून वंचित झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने दखल घेऊन तत्काळ न्याय देण्याची मागणी शेतकरी किशोर कासनगोट्टूवार, पांडुरंग भगत, बंडू गौरकार, संदीप मोरे आदींनी केली आहे.