शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

९ लाख ९१ हजार पुस्तकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:55 IST

येत्या २६ जूनपासून शाळा सुरू होणार असून जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांना ९ लाख ९१ हजार पाठ्यपुस्तकांचे पहिल्याच दिवशी वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. बालभारतीकडे नोंदणी झालेल्या पंचायत समित्यांना थेठ पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली.

ठळक मुद्दे९३ टक्के शाळांना पाठ्यपुस्तके वाटप : बालभारतीकडून पंचायत समित्यांना थेट पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येत्या २६ जूनपासून शाळा सुरू होणार असून जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांना ९ लाख ९१ हजार पाठ्यपुस्तकांचे पहिल्याच दिवशी वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. बालभारतीकडे नोंदणी झालेल्या पंचायत समित्यांना थेठ पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली. २६ जूनपर्यंत १०० टक्के उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.सर्वाशिक्षा अभियानअंतर्गत जिल्हा परिषद, मनपा, नगरपरिषद, शासकीय, अनुदानीत, अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातात. यापूर्वी पाठ्यपुस्तकांची मागणी जिल्हास्तरावर पार पडली. पुस्तकांच्या नोंदणीची संख्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठविल्यानंतर बालभारतीकडे माहिती सादर होत असे. त्यानंतर ही पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचत होती. परिणामी दरवर्षी पाठ्यपुस्तक शाळांपर्यंत पोहोचण्यास उशिर व्हायचा. यंदा बालभारतीने पुस्तकांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. नोंदणीचा आकडा लवकर मिळाल्याने पाठ्यपुस्तके तातडीने प्रकाशित करणे शक्य झाले. जिल्ह्यातून १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकांसाठी नोंदणी करण्यात आली. ही पाठ्यपुस्तके पंचायत समितीस्तरावर पोहोचविण्यात आली असून केंद्रशाळा व त्यानंतर संबंधित प्रत्येक पाठविण्यात येतील. मंगळवार (दि.२० जून) पर्यंत जिल्ह्यातील ९३.२४ टक्के शाळांपर्यंत पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली. शाळा सुरू होण्याच्या आदल्यादिवशीच उर्वरित पुस्तके पाठविण्याची तयार पूर्ण झाल्याची माहिती सुत्रानी दिली.पहिली व आठवीच्यापाठ्यपुस्तकांना विलंबपहिली व आठवीच्या अभ्यासक्रमात यंदा बदल केलेला आहे. बालभारतीने या विषयांची पाठ्यपुस्तके प्रकाशित केली आहेत. हा पुस्तके अद्याप पोहोचली नाहीत. शाळेचा पहिला दिवस पुस्तकांविना जावू नये, असा जि.प. शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.सीबीएसई शाळांकडून एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ठेंगाजिल्ह्यातील सीबीईएसई अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांनी इयत्ता १ ते १० वीतील विद्यार्थ्यांना एनसीइआरटीची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व शाळांना दिले होते. खासगी प्रकाशकांनी प्रकाशित केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिल्यास दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही केली आहे. मात्र, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बहुतेक सीबीएसई शाळांच्या संस्थाचालकांनी या आदेशाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना खासगी प्रकाशनाची पाठ्यपुस्तके विकत घेण्यास बंधनकारक करीत आहेत. पॅरेंट्स असोसिएशन फ ॉर चिल्ड्रन एज्युकेशनचे सचिव मनोज लडके यांनी यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली होती. दरम्यान शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व सीबीईएससी शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना नोटीस पाठवून एनसीईआरटीची पाठ्यपुस्तकांचा वापर करा, असे कळविले. परंतु, सर्वच शाळांनी या नोटीसाला ठेंगा दाखविल्याचा आरोप पालक करीत आहेत.