शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

९७८ दिव्यांगांना उपयोगी साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:04 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांगांना जीवनउपयोगी साहित्याचे वाटप होत आहे. यामाध्यमातून दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. बल्लारपूर येथील रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात ९७८ दिव्यांगांना साहित्य वाटप करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : बल्लारपुरात दिव्यांग मेळावा, बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांगांना जीवनउपयोगी साहित्याचे वाटप होत आहे. यामाध्यमातून दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. बल्लारपूर येथील रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात ९७८ दिव्यांगांना साहित्य वाटप करताना ते बोलत होते.यावेळी आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती व कार्यक्रम संयोजक ब्रिजभूषण पाझारे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी ना. अहीर म्हणाले, समाजामधील सर्व घटकांना न्याय देण्याचा दंडक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिला आहे. दिव्यांग हे सामाजिक घटक असून त्यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे. केंद्र सरकारकडून दिव्यांगांना न्याय देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या.२०१८-१९ मध्ये दिव्यांगाची नोंदणी करण्याचा कार्यक्रमजिल्ह्यात सुरू झाला. आतापर्यंत ९७८ लोकांची नोंदणी झाली. परंतु हा शेवटचा टप्पा नाही. जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांगांचा शोध घ्यायचा आहे. त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद व अन्य सर्व यंत्रणांनी नोंदणीचे काम सामाजिक दायित्वाच्या जबाबदारीने करावे, असेही त्यांनी नमूद केले. राज्य व केंद्र सरकारचे जे दायित्व आहे त्याला आम्ही विसरता कामा नये. केंद्र शासनाच्या दिव्यांग हिताच्या योजना जिल्ह्यामध्ये लागू होतील आणि सगळ्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही ना. अहीर यांनी यावेळी दिव्यांगांच्या कुटुंबीयांना दिले. ‘दिव्यांग प्रतिबंधात्मक माहिती व उपाय आणि दिव्यांगाकरिता योजना’ या पुस्तिकेचे ना. अहीर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.दिव्यांग क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी श्रवणयंत्र, एमआर कीट, स्मार्टकाठी, तीन चाकी सायकल व अन्य साहित्याचे वाटप दिव्यांगांना वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. खेमणार म्हणाले, केंद्र शासनाने पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा कायदा केला आहे. हा निधी खर्च झाला नाही तर जिल्हा परिषदेला जमा होतो.त्यामुळे सर्व दिव्यांगाना निश्चित लाभ मिळेल. यासंदर्भात दिव्यांगांच्या कुटुंबीयांनी जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचेही त्यांनी सांगितले. रोजगार निर्मिती संदर्भात प्रकल्पाची माहिती देण्यात आली. विविध संघटनांकडून दिवसभर सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम झाले.कार्यक्रमाला नगरसेवक व विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी जाधव व संचालन रवी नलगंटीवार यांनी केले.