शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी तलावात आठ टक्केच पाणी

By admin | Updated: August 14, 2015 01:20 IST

सिंदेवाही तालुक्यात कुठलाही मोठा उद्योग नसल्याने नागरिक संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे.

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यात कुठलाही मोठा उद्योग नसल्याने नागरिक संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. येथील शेती ही घोडाझरी या एकमेव तलावावर अवलंबून असून तलावामध्ये केवळ आठ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झालेला आहे.नवरगाव परिसराचा विचार केल्यास ९५ टक्के शेती ही घोडाझरी या एकमेव तलावावर अवलंबून असून आॅगस्ट महिना अर्धा होत आला तरी केवळ आठ टक्के जलसाठा तलावात आहे. या तलावावर ६ हजार ८०० हेक्टर शेतजमिनीचे सिंचन अवलंबून आहे. या परिसरात धानाचे मुख्य पीक असून आर्थिक व्यवस्था शेतीवरच निर्भर आहे. दरवर्षी १५ आॅगस्टच्या आसपास घोडाझरी कालव्याचे पाणी या परिसरात येत होते. परंतु आठ टक्केच पाणी असल्याने आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घोडाझरी तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकऱ्यांनी रोवणीच केलेली नाही, हे विशेष.निसर्गानेही यावर्षी दगा दिला असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. पाऊस नसल्याने धान पऱ्ह्याची काही शेतकऱ्यांनी दुबार- तिबार पेरणी केली. यासाठी विविध संस्था, खासगी सावकाराकडून कर्जही घेतले. परंतु निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी पूर्णत: खचलेला आहे.गोसीखुर्द धरणाचे पाणी या परिसरात आणणार, असा गाजावाजा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला. परंतु आज शेतकऱ्यांवर गोसीखुर्दच्या पाण्याची नितांत गरज असतानासुद्धा ते मिळू शकलेले नाही. परंतु गोसीखुर्दचे पाणी मिंडाळा ब्रॅचमधून उपसा सिंचन योजनेद्वारे घोडाझरी तलावात आणणे व शेतकऱ्यांना पुरवठा करणे शक्य आहे. त्यासाठी शासनाने, राजकीय पुढाऱ्यांनी, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ही योजना शक्य झाल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना पहिले धानाच्या रोवणीसाठी व पीक घेण्यास लाभदायक ठरणार आहे. नाही तर शेतकरी हा आर्थिकदृष्टया पुन्हा कमकुवतच होणार आहे.घोडाझरी सिंचाई शाखेच्या अंतर्गत पुन्हा पाच मालगुजारी तलाव आहेत. परंतु त्यांचीही परिस्थिती तशीच आहे. केवळ गिरगाव येथील मालगुजारी तलावात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून इतर चार तलावात निघणारे पाणी शुन्य आहे. या परिसरातील तलाव, खासगी बोड्या यासुद्धा कोरड्याच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर आहे.घोडाझरी सिंचाई शाखा नवरगाव येथील शाखा अभियंत्याचे पद मागील चार- पाच महिन्यापासून खाली असून येथील अतिरिक्त पदभार गोविंदपूर येथील शाखा अभियंता ए.एस. यादव यांच्याकडे आहे. दरवर्षी पावसापूर्वी कालव्याच्या दुरुस्तीची कामे केली जात होती. मात्र यावर्षी कामेच झाली नाहीत. समजा घोडाझरी तलावाला पाणी आले आणि सोडण्याचा प्रसंग आला तरी कालव्याच्या दुरुस्तीअभावी पाण्याचे वितरण करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. इंग्रजांच्या काळापासून नवरगाव शाखेची इमारत असून ही इमारत कालबाह्य झालेली आहे. पावसात कार्यालय गळते. त्यामुळे अधिकारी येथे राहात नाहीत. विशेष म्हणजे, लगतच जागा असून त्यावर क्वार्टर बांधले तर अधिकारी येथेच राहतील आणि शेतकऱ्यांच्या सोईचे होईल.एकूण शेतकरी हा निसर्गाकडून नागविला गेला असून आता रोवणी करणेही शक्य राहिले नाही. त्यामुळे तो मोठ्या विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आशा उंचावण्यासाठी गोसीखुर्दचे पाणी घोडाझरीत टाकून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. (वार्ताहर)