शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यातील ७७ हातपंप नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:53 IST

गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षीचा उन्हाळा सुरू होण्यापुर्वीच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे. अशातच ग्रामीण नागरिकांची तहाण भागविणारे हातपंपही बंद अवस्थेत असल्याने तीव्र पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची झळ : प्रशासनाने उपाययोजना कराव्या

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षीचा उन्हाळा सुरू होण्यापुर्वीच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे. अशातच ग्रामीण नागरिकांची तहाण भागविणारे हातपंपही बंद अवस्थेत असल्याने तीव्र पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील ७७ हातपंप बंद अवस्थेत असून छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च ग्रामपंचायतीकडून मिळत नसल्याने हातपंप अजूनही बंद आहेत.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यात ३६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. सोबतच नऊ हजारांच्या आसपास हातपंप आहेत. या हातपंपाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे एक पथक आहे. तालुकास्तरावर असलेल्या या पथकाकडे हातपंप दुरुस्तीच्या तक्रारी आल्यावर ते तातडीने तेथे जाऊन दुरुस्तीचे काम करते. यासाठी संबंधीत ग्रामपंचायतीला दुरुस्तीसाठी पैसे द्यावे लागतात.मात्र, अनेक ग्रामपंचायती देखभाल दुरुस्तीसाठी पैसेच देत नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे रेंगाळली आहेत. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी बंद हातपंपाचा मुद्दा उपस्थित केला. टंचाईच्या काळात ७७ हातपंप बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटक्ती करावी लागत असल्याचाही मुद्दा मांडला. त्यावर लवकरच या बंद हातपंपाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगत आले.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. मागील वर्षी ८६० मिमी इतकाच पाऊस झाला. सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसाने नदी, नाले आटले आहे. परिणामी चंद्रपूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असून अन्य भागांतही अशीच स्थिती आहे.