शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

७६ गावांत पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: January 3, 2015 00:54 IST

२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले.

मंगेश भांडेकर चंद्रपूर२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या भूजल पातळीवर झाला आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सप्टेंबर २०१४ पर्यंत ०.०६ मीटरने घटली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रामधील तब्बल ७६ गावांत उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचे संकेत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणी टंचाई आराखडे तयार करण्याकरीता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरीता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरिक्षण विहिरीतील मान्सूनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या अभ्यासाच्या आधारे संभाव्य पाणी टंचाईचा प्राथमिक तांत्रिक अहवाल तयार करून टंचाईग्रस्त गावांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येते. या अहवालाच्या आधारेच पाणी टंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सहकार्याने पाणी टंचाई कृती आराखडा आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असे तीन टप्यात तयार करण्यात येते. पहिल्या टप्यातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून यात ७६ गावांत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ११४४३ चौ.किमी आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता व वर्धा नदी खोऱ्यात समाविष्ट असलेल्या ५८ पाणलोट क्षेत्रामधील ४०० लघु पाणलोट क्षेत्रातील १३४ विहिरींचे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निरीक्षण करण्यात आले. यात मागील पाच वर्षातील आॅक्टोबर महिन्यामधील पाणी पातळी २.६६ मीटर सरासरीच्या तुलनेत यावर्षी घट होऊन २.६० मीटर पाणी पातळी झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसाधारण हवामान विषम असते. दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्व दिशेने वाहणारे मौसमी वारे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये (मान्सून कालावधी) बरसात करतात. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ११४२.०७ मिमी आहे. मात्र, २०१४ च्या मान्सून कालावधीत सरासरी ७३.४६ टक्के पर्जन्यमानापेक्षा २६.५३ टक्के कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील ७६ गावांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.