शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

७६ गावांत पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: January 3, 2015 00:54 IST

२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले.

मंगेश भांडेकर चंद्रपूर२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या भूजल पातळीवर झाला आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सप्टेंबर २०१४ पर्यंत ०.०६ मीटरने घटली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रामधील तब्बल ७६ गावांत उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचे संकेत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणी टंचाई आराखडे तयार करण्याकरीता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरीता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरिक्षण विहिरीतील मान्सूनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या अभ्यासाच्या आधारे संभाव्य पाणी टंचाईचा प्राथमिक तांत्रिक अहवाल तयार करून टंचाईग्रस्त गावांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येते. या अहवालाच्या आधारेच पाणी टंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सहकार्याने पाणी टंचाई कृती आराखडा आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असे तीन टप्यात तयार करण्यात येते. पहिल्या टप्यातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून यात ७६ गावांत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ११४४३ चौ.किमी आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता व वर्धा नदी खोऱ्यात समाविष्ट असलेल्या ५८ पाणलोट क्षेत्रामधील ४०० लघु पाणलोट क्षेत्रातील १३४ विहिरींचे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निरीक्षण करण्यात आले. यात मागील पाच वर्षातील आॅक्टोबर महिन्यामधील पाणी पातळी २.६६ मीटर सरासरीच्या तुलनेत यावर्षी घट होऊन २.६० मीटर पाणी पातळी झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसाधारण हवामान विषम असते. दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्व दिशेने वाहणारे मौसमी वारे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये (मान्सून कालावधी) बरसात करतात. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ११४२.०७ मिमी आहे. मात्र, २०१४ च्या मान्सून कालावधीत सरासरी ७३.४६ टक्के पर्जन्यमानापेक्षा २६.५३ टक्के कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील ७६ गावांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.