शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपयांत उरकले ७२४ जोडप्यांनी लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

चंद्रपूर : विवाह सोहळ्यात वारेमाप खर्च करण्याच्या पद्धतीला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील ७२४ जोडप्यांनी २०० रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह ...

चंद्रपूर : विवाह सोहळ्यात वारेमाप खर्च करण्याच्या पद्धतीला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील ७२४ जोडप्यांनी २०० रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

विवाह सोहळा सदैव स्मरणात राहावा, यासाठी नवदाम्पत्य हजारो आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवीत लग्नात वारेमाप खर्च करतात. मात्र, कोरोनाने विवाह सोहळ्याची परिभाषाच बदलविली आहे. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे निर्देश प्रशासनाचे असल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या या संकटात २०२० मध्ये ४०५ जोडप्यांनी, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांना विवाहासाठी १५० रुपये मॅरेज फी व ५० रुपये नोंदणी फी असा केवळ २०० रुपयांचा खर्च आला.

बॉक्स

कधी किती झाले नोंदणी विवाह

कठीण काळात घेतला बचतीचा निर्णय

२०१८ ३४०

२०१९ ४३०

२०२० ४०५

२०२१ जानेवारी ६५

२०२१ फेब्रुवारी ७८

२०२१ मार्च ५९

२०२१ एप्रिल ४१

२०२१ मे २६

२०२१ जून ५०

बॉक्स

२०२१ मध्ये नोंदणी वाढली

दरवर्षी जिल्ह्यात ३०० च्या जवळपास नोंदणी पद्धतीने विवाह सोहळे पार पडत होते. सन २०२० मध्ये जिल्ह्यात ४०५ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. कोरोनाने सार्वजनिक विवाह सोहळ्याला निर्बंध असल्याने गरीब, सर्वसामान्यांसह नोकरदार व मोठ्या घराण्यातसुद्धा नोंदणी विवाहाला पसंती दिली आहे.

------

कोट

मागील वर्षीपासून कोरोनाचे सावट आहे. यामध्ये जिल्ह्यातील युवकाचा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे कल आहे. दीड वर्षात ७२४ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले आहेत.

बी. एन. माहोरे विवाह अधिकारी, चंद्रपूर

-------

बॉक्स

ऑनलाइन ॲप्लिकेशन गरजेचे

नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. यावेळी वधू आणि वरांनी वयाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. संपूर्ण कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर अर्ज केलेल्या दिवसापासून ३० दिवसांनंतर आणि ९० दिवसांच्या आत लग्नाची तारीख दिली जाते. त्या दिवशी दोघांकडील साक्षीदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष विवाह पार पडतो.

------

बॉक्स

केवळ २०० रुपये खर्च

वधू आणि वर हे दोघेही जर जिल्ह्यातीलच असतील, तर ५० रुपये नोंदणी शुल्क व १५० रुपये मॅरेज शुल्क असा दोनशे रुपयांचा, तर वर किंवा वधू दोघांपैकी एखादा जिल्ह्याबाहेरील असेल तर नोंदणी शुल्क १०० रुपये व मॅरेज शुल्क १५० असा २५० रुपयांचा खर्च येतो. नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.