शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

दोनशे रुपयांत उरकले 724 जोडप्यांनी लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

विवाह सोहळा सदैव स्मरणात राहावा, यासाठी नवदाम्पत्य हजारो आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवीत लग्नात वारेमाप खर्च करतात. मात्र, कोरोनाने विवाह सोहळ्याची परिभाषाच बदलविली आहे. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे निर्देश प्रशासनाचे असल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या या संकटात २०२० मध्ये ४०५ जोडप्यांनी, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

ठळक मुद्देकोरोना संकटात नोंदणी विवाहाला अधिक पसंती

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विवाह सोहळ्यात वारेमाप खर्च करण्याच्या पद्धतीला फाटा देत  कोरोना संकटकाळात जिल्ह्यातील ७२४ जोडप्यांनी दोनशे रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह करून नवा आदर्श निर्माण केला आहे.विवाह सोहळा सदैव स्मरणात राहावा, यासाठी नवदाम्पत्य हजारो आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवीत लग्नात वारेमाप खर्च करतात. मात्र, कोरोनाने विवाह सोहळ्याची परिभाषाच बदलविली आहे. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे निर्देश प्रशासनाचे असल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या या संकटात २०२० मध्ये ४०५ जोडप्यांनी, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांना विवाहासाठी १५० रुपये मॅरेज फी व ५० रुपये नोंदणी फी असा केवळ २०० रुपयांचा खर्च आला.  विशेष म्हणजे, यापुढीलही काळामध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास लग्न असलेल्या घरच्या कुटुंबावर  विशेषत: मुलीच्या वडीलांना येणारा आर्थिक  तसेच मानसिक ताण कमी करता येईल.

२०२१ मध्ये नोंदणी वाढली

दरवर्षी जिल्ह्यात ३०० च्या जवळपास नोंदणी पद्धतीने विवाह सोहळे पार पडत होते. सन २०२० मध्ये जिल्ह्यात ४०५ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. कोरोनाने सार्वजनिक विवाह सोहळ्याला निर्बंध असल्याने गरीब, सर्वसामान्यांसह नोकरदार व मोठ्या घराण्यातसुद्धा नोंदणी विवाहाला पसंती दिली आहे.

ऑनलाईन अप्लीकेशन गरजेचेनोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. यावेळी वधू आणि वरांनी वयाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. संपूर्ण कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर अर्ज केलेल्या दिवसापासून ३० दिवसानंतर आणि ९० दिवसांच्या आत लग्नाची तारीख दिली जाते. त्या दिवशी दोघांकडील साक्षीदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष विवाह पार पडतो.

केवळ २०० रुपये खर्चवधू आणि वर हे दोघेही जर जिल्ह्यातीलच असतील, तर ५० रुपये नोंदणी शुल्क व १५० रुपये मॅरेज शुल्क असा दोनशे रुपयांचा, तर वर किंवा वधू दोघांपैकी एखादा जिल्ह्याबाहेरील असेल तर नोंदणी शुल्क १०० रुपये व मॅरेज शुल्क १५० असा २५० रुपयांचा खर्च येतो. नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.

मागील वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. यामध्ये जिल्ह्यातील युवकांचा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे कल आहे. दीड वर्षात ७२४ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले आहेत.-बी. एन. माहोरे विवाह अधिकारी, चंद्रपूर 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या