शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

जिल्ह्यातील ७१९ गुरुजी सापडले अडचणीत

By admin | Updated: March 9, 2016 02:06 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागावर अवकळा ओढवली आहे. यात विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमालिची घटत आहे. परिणामी शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा आकडाही फुगला आहे.

कोरपना तालुक्यात ८८ शिक्षक अतिरिक्त : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वास्तवअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरजिल्हा परिषद शिक्षण विभागावर अवकळा ओढवली आहे. यात विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमालिची घटत आहे. परिणामी शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा आकडाही फुगला आहे. या विभागात उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर विषय शिक्षक आणि प्राथमिक सहाय्यक शिक्षक संवर्गातील तब्बल ७१९ पदे अतिरिक्त श्रेणीत आली आहेत. यामुळे शिक्षकांच्या समादेशनाचा प्रश्न गंभीर वळणावर आला आहे. परिणामी जिल्हाभरातील तब्बल ७१९ गुरुजींना अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कोरपना तालुक्यात सर्वाधिक ८८ शिक्षक अतिरिक्त श्रेणीत आले आहेत.शिक्षण विभागाच्या आयुक्ताने फतवा काढून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून यासंदर्भात अहवाल मागवला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील १ हजार ५७२ प्राथमिक शाळेपैकी तब्बल ३३५ शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद माध्यमिक व माजी शासकीय माध्यमिक शाळा २३ आहेत. येथील विद्यार्थी संख्या आजघडीला समाधानकारक असली तरी भविष्यात येथेही पटसंख्येचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचे शिक्षण धोरण गाव तेथे शाळा असे असून शिक्षणाचा मुलभूत अधिकार देण्याचा आहे. यासाठी काही प्रमाणात कार्यरत शिक्षक गावकऱ्यांच्या मदतीने शाळेला आधुनिकतेचे रुप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र हे प्रमाण बोटावर मोजण्या इतपत आहे.जिल्ह्यात एकूण १५ पंचायत समितीमध्ये सर्व संवर्गातील एकूण ५ हजार ९०९ शिक्षकांच्या पदाला मंजुरी आहे. यातील ५ हजार ८१७ पदे भरण्यात आली. रिक्त पदांचा अनुशेष ८१२ दर्शविण्यात आला असून सर्वाधिक शिक्षकांची रिक्त पदे वरोरा पंचायत समितीत असून त्यांचा आकडा ७५ इतका आहे. रिक्त पदाच्या आकडेवारीत चिमूर तालुका दुसऱ्या स्थानावर असून ७२ शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्व पंचायत समितीस्तरावर तब्बल ७१९ शिक्षकांचे पदे अतिरिक्त असल्याचे अहवालातून दर्शविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना सर्व शिक्षा अभियानाने बळ दिले आहे. सातत्याने नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून शाळांना आधुनिकतेची झालर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पालकांचा कल पाल्यांना इंग्रजी शाळेच्या माध्यमाकडे वळता करीत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नाही. असी बहुसंख्य पालकांची मानसिकता बनली आहे. याला कारणीभूत अपवादात्म शिक्षकही आहे. मात्र सरकारी शाळा बंद होणे, सर्वसामान्य गरीब, आदिवासी दुर्गम भारतील वरच्या मध्ये राहणाऱ्या पालकांना परवडणारे नाही. यावर शासनस्तरावर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांनीही गावाशी नाते वृद्धिंगत करण्याची तेवढीच आवश्यकता आहे. शिक्षणामुळे समाज जीवन प्रगल्भ होत आहे. याला मध्यंतरी थांबवणे योग्य नाही. पटसंख्या कमीचे कारण दर्शवून सार्वजनिक शिक्षण क्षेत्राला संपविण्याचे कट कारस्थान समन्वयातून तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यातील १ हजार ५७२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळापैकी ३३५ शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे समावेशन जवळच्या शाळेत करण्याचे शालेय शिक्षण विभागो ठरविले आहे. शासन विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची जबाबदारी स्वीकारण्याच्या तयारीत आहे. मात्र अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समावेशनाचा प्रश्न शासनाला अडचणीचा जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आस्थापना विभाग शिक्षण आणि आरोग्य विभागात सर्वाधिक कर्मचाऱ्यांची संख्या आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाला यासाठी चांगलाच घाम फुटणार आहे.चिमूर तालुक्यात सर्वाधिक शिक्षकजिल्हा परिषद अंतर्गत चिमूर तालुक्यात सर्वाधिक शिक्षकांची संख्या आहे. येथे एकूण शिक्षकांची संख्या ५७७ झाली असून येथे ५४२ पदांचा भरणा करण्यात आला आहे. चंद्रपूर ३९३ पैकी ४०७, मूल ३३८ पैकी ३४७, सावली ३९२ पैकी ३७९, पोंभुर्णा २१४ पैकी २१९, गोंडपिपरी ३८० पैकी ३४५, राजुरा ४७६ पैकी ४६८, कोरपना ४१८ पैकी ४३८, जिवती ३९३ पैकी ३६६, बल्लारपूर ११२ पैकी १०५ , भद्रावती ४४२ पैकी ४४५, वरोरा ५०३ पैकी ४९७, नागभीड ४४२ पैकी ४१७, ब्रह्मपुरी ५०५ पैकी ४९५ तर सिंदेवाही तालुक्यात एकूण ३४४ शिक्षकांच्या पदांपैकी ३४७ पदांचा भरणा करण्यात आला आहे. यात मंजूर पदे ५ हजार ९०९ असून एकूण ५ हजार ८१७ पदे भरण्यात आल्याचे दर्शविण्यात आले.बल्लारपूर तालुक्यात रिक्त पदांचा अनुशेष कमीशिक्षक संवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष बल्लारपूर तालुक्यातसर्वात कमी १२ इतका असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या ५ आहे. सिंदेवाही ४२ रिक्त व ४५ अतिरिक्त, ब्रह्मपुरी ५४ रिक्त व ४४ अतिरिक्त, नागभीड ३७ व ३२, चिमूर ७२ व ३७, वरोरा ७५ व ६९, भद्रावती ५० व ५३, जिवती ७३ व ४६, कोरपना ६८ व ८८, राजुरा ७३ व ६५, गोंडपिपरी ६८ व ३३, पोंभुर्णा ३० व ३५, सावली ५६ व ४३, मूल ४३ व ५२ तर चंद्रपूर तालुक्यात एकूण ५८ शिक्षकांची पदे रिक्त असून तब्बल ७२ शिक्षकांना अतिरिक्त म्हणून ठेवण्यात आले आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा अनुशेष ८१२ तर ७१९ गुरुजींना अतिरिक्तच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.